शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:43 PM

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी पट्टी वाढविण्यास सदस्यांनी विरोध केला. मात्र, पाणी योजनेचा ९५ टक्के खर्च वीज बील भरण्यातच जात असल्यामुळे पाणीपट्टीत वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रशासनाने वाढीव पाणीपट्टीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, आता हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. पूर्वी १ हजार ५०० रुपये पाणी पट्टी होती. आता ही पाणी पट्टी २ हजार ५०० करण्यात आली आहे. नगर शहरात ५३ हजार ६०४ अधिकृत नळधारक आहेत. वाढीव पाणीपट्टीला महासभेत मंजुरी मिळाल्यास महापालिकेला वार्षिक १ कोटी ३४ लाख १० हजार रुपये महसूल मिळणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ आवश्यक असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्थायी समितीच्या सभेला बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, संजय शेंडगे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, विक्रम दराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका