शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:54 PM

नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

विनायक चव्हाण । मिरजगाव : नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रित मुरुम टाकल्याने काही ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरात दुसºयांदा खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होत असून अनेक अपघातही होत आहेत.खड्ड्यांमध्ये टाकलेली माती, वाहनांची संख्या अधिक असल्याने आठवडाभरही राहत नाही. मातीमुळे मार्गावर प्रचंड धुळीचे लोट उठतात. यामुळे अनेकदा समोरील वाहनही दिसत नाही. हा रस्ता मिरजगाव, माहिजळगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी येथे लोकवस्तीतून जातो. त्यामुळे येथील व्यावसायिक, रहिवासी, पादचारी यांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.हा रस्ता निमगाव डाकूपर्यंत पूर्णत: खराब झाला आहे. तातडीने या मार्गावर पूर्णपणे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे. मिरजगावपासून ते नगरपर्यंत यामार्गावर पावसाने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. जोतिबावाडी, कठिणदेव, आंबिलवाडी, शिराढोण या परिसरात साईडपट्ट्या दोन फुटाहून खोल गेल्या आहेत. काही ठिकाणी डांबरीकरणाचे अस्तरच शिल्लक राहिलेले नाही. मिरजगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी, शिराढोण, माहिजळगाव, रेल्वे क्रॉसिंग येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. महामार्ग प्राधिकरणाकडे हा राज्यमार्ग हस्तांतरित होणार आहे हे कारण पुढे करून गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग हा मार्ग दुरूस्त करण्यास टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायतीने मिरजगावमधील बावडकरपट्टी ते उकरी नदीपर्यंचा रस्ता तातडीने दुरूस्त करण्यासंदर्भात पत्र दिले. येत्या आठ ते दिवसात हा रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे यांनी सांगितले. मिरजगावसह जास्त अंतर असलेला खराब रस्ता दुरूस्त होण्यासाठी दहा दिवसाचा अवधी लागेल. आठ दिवसात नगर ते माहिजळगावपर्यंतचे खड्डे बुजवून होतील, असे अहमदनगर जागतिक बँक प्रकल्पाचे शाखा अभियंता रामराव वाघ यांनी सांगितले.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSolapurसोलापूर