शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

मनपा इलेक्शन राऊंड : महापौरपदाचा ३०० कोटींचा सौदा

By सुधीर लंके | Published: November 27, 2018 3:42 PM

‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते.

सुधीर लंके‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. भाजपची सत्ता असल्याने ते खूप पैसे लावणार अशीही चर्चा होती. दानवे यांनी प्रत्यक्षात हा पाऊस पाडायला सुरुवातही केली, असे म्हणता येईल.अर्थात दानवे यांचे विधान इतके साधे सरळ नाही. ते लबाडाचे आवतन दिसते. ‘सत्ता आली तरच पैसे देऊ,’ असाच त्यांच्या विधानाचा थेट अर्थ निघतो. आम्हाला सत्ता देणार नसाल तर राज्य व केंद्राचा पैसा रोखून या शहराची मुस्कटदाबीही करु शकतो, अशी या विधानाची दुसरी बाजू आहे. म्हणजे सत्ता देणार नसाल, तर तुमचे शहर गेले तेल लावत, असा हा सरळ हिशेब आहे.राजकारणात मतलबाशिवाय काहीच होत नाही, असे म्हणतात. भाजपही त्याच मार्गाने निघाला आहे. वास्तविकत: गत अडीच वर्षे शहरात सेना-भाजप या मित्रपक्षांचीच सत्ता आहे. उपमहापौरपद भाजपकडे होते. महापालिकेची स्थायी समिती भाजपकडे होती. खासदारकी भाजपकडे आहे. जिल्ह्यात पाच आमदार भाजपचे आहेत. पालकमंत्री भाजपचे आहेत. नगर जिल्ह्याने भाजपला एवढे भरभरुन दिले असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरासाठी भाजपने काय दिले? याचा हिशेब दानवे यांनी मांडला असता तर बरे झाले असते.खासदार दिलीप गांधी यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार भाजप सरकारने या शहराला मूलभूत विकास योजनांसाठी केवळ दहा कोटी रुपये दिले व उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्र्यांनी पन्नास कोटी देण्याची घोषणा केली आहे. (हा निधी अजून यायचा आहे. साईबाबांच्या शताब्दी उत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी ३२०० कोटी देण्याची घोषणा केल्यानंतर छदामही आलेला नाही हे एक उदाहरण पाठिशी आहे.) त्यामुळे दानवेंचे तीनशे कोटी कधी पोहोचतील, हा पुढचा प्रश्न आहेच. मुद्दा असा आहे, उद्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपने आजच्या सत्ताकाळात निधी का दिला नाही? तीनशे कोटी मिळण्यासाठी या शहराने भाजपचाच महापौर होण्याची वाट का पाहत बसावी? महापौर नाही म्हणून सरकार या शहराचे विकासाचे दरवाजे बंद करुन ठेवणार का?यापूर्वी शहरात असेच घडत आले. शहरात सेना-भाजपची सत्ता असली की राज्यात कॉंग्रेसचे सरकार असायचे. त्यातून निधी अडवला जायचा. आता शहरात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असतानाही भाजपने निधी दिला नाही. का, तर शतप्रतिशत आम्हालाच सत्ता हवी हा त्यांचाही अट्टाहास.नगरचा विकास हा राज्यकर्त्यांच्या लहरीवर व मर्जीवर अवलंबून आहे, हे दानवे यांनी सांगूनच टाकले आहे. एकीकडे कॉंग्रेसने निधी दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे निधी देण्याबाबत त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या अटी-शर्तीही टाकल्या. दानवे दिसतात तितके सरळ नाहीत. मराठवाड्यात व जालना जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात ते ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. ‘चकवा’ देण्यासाठीही ते खूप प्रसिद्ध आहेत. ते बोलतील तसे करतीलच याचा भरवसा नसतो अशी त्यांची ख्याती आहे. ‘मी बारा भोकाचा सायकलचा पाना आहे. हा पाना कोठेही बसवा. तो फिट बसतो’, अशी उपमा त्यांनीच स्वत:ला दिलेली आहे. मी जेथे नारळ फोडला ती पालिका ताब्यात घेतली, असा दृष्टांतही त्यांनी सांगितला आहे. हा नारळ कोणाला पावणार हे पहायचे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महापालिका निवडणूक