शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

अहमदनगर जिल्ह्यातील ३७ हजार कृषिपंपांची वीज महावितरणने तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:24 PM

वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकांवर परिणाम २ हजार २५० कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होणार आहे. चालू बील भरून शेतक-यांनी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५७ हजार शेतकºयांकडे २ हजार २८५ कोटींची थकबाकी आहे. त्यात मूळ थकबाकी १ हजार ३३८ कोटींची असून उर्वरित दंड व व्याज आहे. थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतक-यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले होते.३१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असलेल्या या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ८८ हजार शेतक-यांनी सहभाग नोंदवला व चालू बिलाच्या रकमेपोटी ३५ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला. परंतु अजूनही २ लाख ६९ हजार शेतक-यांकडे २ हजार २५० कोटींची थकबाकी आहे.या योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १ डिसेंबरपासून महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुकानिहाय थकबाकी असलेल्या कृषिपंपाची वीज खंडित करण्यास प्रारंभ झाला असून २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांवर कारवाई झाली आहे.चालू बील भरून कारवाई टाळाशेतक-यांंनी चालू बील किंवा ३ ते ५ हजार रूपये भरून कारवाई टाळावी. पैसेच भरले नाही तर वीज खंडित केल्याशिवाय पर्याय नाही. बिलाबाबत काही शंका, दुरूस्ती असेल तर स्थानिक उपकार्यालयात संपर्क करावा, तेथे कक्ष स्थापन केलेले आहेत. सर्व शंकांचे निरसन होईल. - अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी