शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मार्चएण्ड झाला... अहमदनगर जिल्हा परिषदेचा ८२ टक्के निधी खर्च

By चंद्रकांत शेळके | Published: April 02, 2024 8:30 PM

अजूनही ६० कोटी अखर्चित : कृषी, समाजकल्याण विभागाचा १०० टक्के खर्च

चंद्रकांत शेळके अहमदनगर : गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेत निधी खर्च करण्याचे नियोजन सुरू होते. त्यात बऱ्यापैकी यश आल्याने जिल्हा परिषदेचा मार्चअखेर ८२ टक्के निधी खर्च झाला आहे. आता उर्वरित १८ टक्के म्हणजे सुमारे ६० कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ मिळवावी लागणार आहे. दरम्यान, कृषी, समाजकल्याण विभागाचा १०० टक्के निधी खर्च झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषदेला निधी मंजूर केला जातो. निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्षांची असते. परंतु तरीही दरवर्षी हा निधी अखर्चित राहतोच. सन २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून ३२७ कोटी ८७ लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून मार्चअखेर २६८ कोटी एवढाच निधी खर्च झाला. परिणामी अजूनही ५९ कोटी ८४ लाखांचा निधी अखर्चितच आहे. जिल्हा परिषदेवर पदाधिकारी आणि सदस्य मंडळ अस्तित्वात असताना निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण याहीपेक्षा जास्त होते.दरम्यान, २०२२ पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात निधी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी मार्चअखेर ८० टक्के खर्च झाला होता. यावर्षी त्यात २ टक्के वाढ होऊन ते प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वाधिक निधी समाजकल्याणला

खर्चाच्या बाबतीत कृषी व समाजकल्याण विभागाने बाजी मारली आहे. कृषी विभागाने ६ पैकी ६ कोटी खर्च केले आहेत. तर समाजकल्याण विभागाने ८१ कोटी ९७ लाख म्हणजे १०० टक्के निधी खर्च केला आहे. सर्वाधिक निधी समाजकल्याण विभागालाच मिळालेला आहे.निधी खर्च करण्यात शिक्षण, बांधकाम मागे

निधी खर्च करण्यात शिक्षण विभाग, तसेच बांधकाम विभाग मागे आहे. सर्वात कमी म्हणजे ५५.५० टक्के निधी बांधकाम (दक्षिण) विभागाचा आहे. त्यानंतर ५८ टक्के शिक्षण विभाग, तर ६७ टक्के निधी बांधकाम (उत्तर) विभागाने खर्च केलेला आहे.[8:22 PM, 4/2/2024] +91 98603 11060: दोन वर्षांपासूनचे प्रस्ताव रखडले, आंतरजातीय अनुदान मिळेनासमाजकल्याण विभाग : ३२० प्रस्तावांसाठी हवा आहे १ कोटी ६० लाखांचा निधी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद