शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 5:06 PM

भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.

श्रीगोंदा विधानसभा निवडणूक विश्लेषण - बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली.प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.  निवडणुकीत एकतर्फी यश मिळेल या आशेने पाचपुते यांचे समर्थक सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. अपेक्षेप्रमाणे तेराव्या फेरी अखेर पाचपुते यांनी आघाडी राखली होती. मात्र त्यांना मोठी आघाडी नव्हती. अवघी तीन ते चार हजाराच्या आसपास आघाडी होती. १७ व्या फेरी अखेर घनश्याम शेलार यांनी ३३५७ मतांची आघाडी घेतल्याने चुरस निर्माण झाली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. त्यानंतर घोड कालव्याचा पट्टा पुन्हा एकदा पाचपुतेंच्या मागे उभा राहिला. श्रीगोंदा शहर, लिंपणगाव, काष्टी व आढळगाव या गावांनी निर्णायक आघाडी देत पाचपुतेंना तारलेनिवडणुकीच्या सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उमेदवारी नाकारली. नागवडे यांनी तर भाजपत प्रवेश करून पाचपुतेंमागे ताकद दिली. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्टÑवादीच्या उमेदवारीची माळ घनश्याम शेलार यांच्या गळ्यात घातली. शेलार यांच्या मागे आमदार जगताप यांनी ताकद उभी केली. शेलारांसाठी शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्याही सभा झाल्या होत्या. पवारांच्या सभेतनंतर श्रीगोंद्यात रंगत निर्माण झाली. ही निवडणूक कुकडी, घोडचे पाणी अगर इतर प्रश्नांभोवती फिरण्याऐवजी शरद पवारांविषयी सहानुभूती, नातेगोते अशा मुद्यांकडे वळली होती. पाचपुते यांनी त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या सहाय्यानेच प्रचार केला. पाचपुते यांना एक लाख दोन हजार ५०३, तर घनश्याम शेलार यांना ९७ हजार ९८० मते मिळाली. संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बिलासाठी आंदोलन उभारले. मात्र त्यांना जनतेनेस्वीकारले नाही. वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र सुपेकर यांनी ३ हजार १८६ मते मिळाली.आघाडी राष्ट्रवादीची.. जल्लोष भाजपचा  चौदाव्या फेरीपासून राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी आघाडी घेतली होती. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष चालूच ठेवला होता. नंतर ते शांत झाले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना चांगलीच हुरहुर लागली होती. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची फेरमोजणी..व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व ईव्हीएममधील प्रत्यक्ष मतदान यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या मतात एकाची तफावत आढळली. याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतिनिधी मोहन भिंताडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे तक्रार केली व फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे चिठ्ठ्यांची पुन्हा मोजणी करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर मोजणीअंती ही तफावत दूर झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. सर्वांच्या साथीने विजयसन २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा एंट्री करणे अवघड होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि सतत जनसंपर्क ठेवला. जीवाभावाचे कार्यकर्ते आणि गोरगरीब मतदारांनी दिलेली साथ, यामुळे विजय झाला. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.      

टॅग्स :Babanrao Pachaputeबबनराव पाचपुतेshrigonda-acश्रीगोंदा