शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे कोल्हार येथील तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:52 PM

मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले़ संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

राहुरी : मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास नगर-मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.गेल्या आठवड्यात गावक-यांनी गाढवांच्या बंदोबस्तासाठी मोर्चा काढला होता. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे व मंडल अधिका-यांना लेखी निवेदनही दिले होते. शेतक-यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून बंदोबस्त करू, अशी ग्वाही महसूल विभागाने दिली होती. मात्र, गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे ही गाढवे शेतक-यांच्या शेतामध्ये चरत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कामगार तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले.वाळूचा व्यवसाय करणारे वाळू वाहून झाल्यानंतर गाढवांना मोकाट सोडून देत आहेत. कोल्हार परिसरात असलेले ऊस, चारा व भाजीपाला पिकात शिरून गाढवांचा कळप शेतीची नासधूस करीत आहे. गाढवांच्या माध्यमातून वाळूचा उपसा होत असताना महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल शेतक-यांनी केला. काही गाढवे शेतकरी शरद शिरसाट यांनी शेतात पकडून ठेवली. शेतात गाढवांनी केलेले नुकसान पाहण्यासाठी कामगार तलाठी हरिश्चंद्रे मुठे यांनी यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतक-यांनी तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, सुरेश जाधव, श्रीधर शिरसाट, शरद शिरसाट, राजेंद्र भालेराव, गणेश राऊत, प्रभाकर शिरसाट, गणेश डोके, सचिन शिरसाट, नाना चिखले आदी शेतकरी उपस्थित होते.

कोल्हार खुर्द परिसरात गाढवांचा उपद्रव वाढला आहे. ५० गाढवं वारंवार शेतात शिरून पिकांची नासधूस करतात. महसूल विभागाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करू, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल.-प्रकाश पाटील, सरपंच, कोल्हार खुर्द 

गाढवांच्या मालकांना नोटीस काढण्यात आली आहे़ आम्ही व्यवसाय करणार नाही, असे लिहून घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करण्यात येईल. यापुढे शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी महसूल विभाग घेईल.-अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी