शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

अंतरंगात दयेचा दिवा पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:25 PM

दया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.

सन्मतीवाणीदया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.दया माणसाच्या स्वभावात परिवर्तन घडविते. दया हृदय परिवर्तन देखील करु शकते. जीवन सुखद करण्यासाठी दया आवश्यक आहे. ज्यांच्या हृदयात सरलता आहे. तेथेच धर्माचे वास्तव्य असते. पाणी हे प्रवाही असते. पाण्यात कोणताही पदार्थ सामावून घेण्याची शक्ती असते. दयाळू माणसाच्या हृदयात धर्म वास करतो.धर्मामुळे असत्य दूर होते. स्वभाव बदलतो, प्रत्येक माणसाने भूतदया दाखविण्याची आवश्यकता आहे. भूतदया दाखविणे हाच खरा धर्म मानला जातो. सर्व प्राणीमात्रांवर समान प्रेम करण्यातच आपले हित आहे. ज्याच्या हृदयात दयाच नाही तो दुर्जन समजावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. पित्याने आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करावे. ज्या ठिकाणी मर्यादा आहे तेथेच धर्माचे अस्तित्व असते. ज्या ठिकाणी अधर्म असतो तेथे सुख, शांती नसते. परिवारात प्रेम, स्नेह जपला पाहिजे. तपसाधनेमुळेच मानसिक स्वास्थ्य ठीक राहते. आईचे मुलांबद्दलचे वात्सल्य अमोल असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. जोपर्यंत अंतरंगात दयेचा दिवा प्रकट होत नाही तोपर्यंत जीवनाला जीवन म्हणता येणार नाही. दया नसेल तेथे अधर्म असतो. तो दूर करण्यासाठी अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची आवश्यकता आहे.-प.पू.सन्मती महाराज.

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर