शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 3:20 PM

तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

सत्तार शेखहळगाव : तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सातत्याने होणा-या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून होत आहे.पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाºया मुख्य रस्त्यांपैकी जामखेड-श्रीगोंदा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी सरकारी दरबारी प्रलंबित आहे. निवडणूक काळातही हा मुद्दा चर्चेत असतो. पण नंतर हा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला जातो. या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा या भागात निर्माण झाली होती. त्यानुसार हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम अजूनपर्यंत होऊ शकलेले नाही.जामखेड तालुक्यातील पाटोदा-अरणगाव या भागातून जाणाºया जामखेड-श्रीगोंदा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. एका ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध अक्षरश: तीन फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रत्नापूर फाटा ते अरणगावपर्यंत रस्त्याला साईडपट्टीच दिसत नाही. साईडपट्टीचा भाग दोन दोन फुटांच्या खड्ड्यांनी व्यापला आहे. साईडपट्टीला असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला घेत नाहीत. यातूनच वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कंबरदुखी, मानदुखीने अनेक प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर