शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

प्रतिनियुक्त्यांमुळे प्रशासकीय बदल्यांत कर्मचा-यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:51 AM

जिल्हा परिषदेत अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर आहे त्याऐवजी ते सोयीने दुस-या तालुक्यात अथवा विभागात काम करतात.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर आहे त्याऐवजी ते सोयीने दुस-या तालुक्यात अथवा विभागात काम करतात. बदल्यांच्या प्रक्रियेत मात्र प्रतिनियुक्तीवरील हे कर्मचारी मूळ जागेवरच हजर दाखविले जातात. तालुक्यांच्या जागांचे समानीकरण करतानाही त्यांचे मूळ पद भरलेले दाखविले जाते. त्यामुळे इतर कर्मचा-यांवर समानीकरणात बदल्यांची कु-हाड कोसळते.जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर काम करण्याचे मोठे पेव फुटलेले आहे. प्रशासकीय बदल्यांमुळे अनेक कर्मचा-यांची गैरसोय होते. ज्यांचा कोठेच वशिला नाही असे प्रामाणिक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होतात. जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी मात्र त्यांना कोठेही नियुक्ती मिळाली तरी सेवावर्गाने विशिष्ट तालुक्यातच काम करताना दिसतात. अधिका-यांच्या मर्जीतून हा प्रकार घडतो. अधिकारी ‘अर्थपूर्ण’ संबंधातून या कर्मचा-यांची पाठराखण करतात.वित्त विभाग, बांधकाम विभागातील ठेकेदारांशी संबंधित काही मोक्याच्या जागा अशा कर्मचा-यांनी बळकावलेल्या आहेत. महिला बालकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, शिक्षण अशा सर्वच विभागात अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. कामात गुणवत्ता रहावी, कर्मचाºयांचे विशिष्ट ठिकाणी ‘अर्थपूर्ण’ संबंध निर्माण होऊ नयेत, सर्व कर्मचाºयांना सर्व ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासकीय बदल्या केल्या जातात. बदल्यांच्या या तत्वालाच प्रतिनियुक्त्यांमुळे हरताळ फासला जात आहे. प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.कर्मचा-यांची गुणवत्ता कशी ओळखणार ?प्रतिनियुक्तीसाठी त्या विषयातील तज्ज्ञ कर्मचारी लागतात, अशी सबब अधिकारी व पदाधिकारी पुढे करतात. कोणता कर्मचारी त्या विषयात तज्ज्ञ आहे हे कसे ठरविले जाते? त्यासाठी काही परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाते का? असा प्रश्न आहे. प्रतिनियुक्तीवरच कर्मचारी नियुक्त करावयाचे असतील तर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ती पदे नमूद करुन सर्व कर्मचा-यांना अर्ज सादर करण्याची संधी द्या, असा पर्याय काही कर्मचा-यांनी सूचविला आहे. त्यात पारदर्शीपणा राहील व सर्वांना संधीही मिळेल.बदल्यांमध्ये इतरांवर अन्यायप्रतिनियुक्तीवर काम करत असलेल्या कर्मचा-याचे मूळ पद बदल्यांत रिक्त दाखविले जात नाही. उदा. नगर तालुक्यात एखाद्या विभागात पाच कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात त्यातील दोन कर्मचारी प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे काम करतात. याचा अर्थ या तालुक्यात तीनच कर्मचारी आहेत. मात्र ही बाब विचारात न घेता सर्व पदे भरलेली दाखविल्यामुळे सपाटीकरणात या तालुक्यात इतर कर्मचा-यांवर बदलीची कु-हाड कोसळते.प्रतिनियुक्त्या रद्द होणार का?प्रतिनियुक्त्यांच्या बदल्यांना काहीच निकष नसून ‘वशिला’ किंवा ‘आर्थिक देवघेव’ हे दोनच निकष बहुतांश पदांसाठी असल्याचे कर्मचारी खासगीत सांगतात. दहा-पंधरा वर्षे हे कर्मचारी एकाच ठिकाणी व तालुक्यांत ठाण मांडून आहेत. हा एकप्रकारचा घोटाळा असून या कर्मचा-यांचाही ‘विशेष संवर्ग’ तयार झाला आहे. त्यांची केवळ कागदावर बदली होत राहते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत हरकत घ्यायला हवी व मुख्य कार्यकारी अधिका-यांचे लक्ष वेधायला हवे. मात्र, हा विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसलेला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद