शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करा; अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 3:38 AM

निर्भयाला न्याय देण्यासाठी मौन

अहमदनगर: महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील दोषींना शासन होत नसेल तर लोक हैद्राबाद एन्काऊंटरचे स्वागतच करतील. आपली पोलीस यंत्रणा व न्यायालये देखील महिलांना न्याय देण्यास विलंब लावत आहेत. त्यामुळे संसदेने कडक कायदे करायला हवेत, असे खरमरीत पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून २० डिसेंबरपासून मौन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अण्णांनी या पत्रात आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे, अत्याचाराच्या प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियेत जो विलंब होत आहे त्यामुळे देशातील जनतेत असंतोष आहे. या उद्विग्नतेतूनच लोकांनी हैद्राबादमध्ये झालेल्या एन्काऊंटरचे स्वागत केले. महिलेवरील अत्याचार व हत्या या प्रकरणात पश्चिम बंगालमध्ये १४ आॅगस्ट २००५ रोजी फाशी दिली गेली. त्यानंतर एकाही घटनेत अद्याप फाशी झाली नाही. ४२६ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही अंमलबजावणी होत नसेल तर याला जबाबदार कोण आहे, याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी.

पुण्यातील एका अत्याचार व हत्या प्रकरणात प्रशासनाने विलंब केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने फाशी रद्द केली. या बेजबाबदारपणाचे कोणालाच काही वाटले नाही. असे होत असेल तर गुन्हेगारांचे एन्काऊंटर करा, अशीच मागणी लोक करतील. न्यायदानाला कसा विलंब होतो याचा अनुभव मी स्वत:ही घेतलेला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर नवीन कायदे आले मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. फास्ट ट्रॅक न्यायालयांत सहा लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. महिलांसाठीची १०९१ ही हेल्पलाईन नीट काम करत नाही. अनेक राज्यांनी निर्भया फंडचाही वापर केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

‘न्यायिक उत्तरदायित्वाचा कायदा करा’

अत्याचाराची केस दाखल करण्यापासूनच पोलिसांचा विलंब सुरु होतो. ‘पोलीस रिफॉर्म’चा मुद्दा जसा प्रलंबित आहे. तसे न्यायिक उत्तरदायित्व विधेयकही प्रलंबित आहे. हे विधेयक आले असते तर न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा झाली असती, असेही अण्णांनी म्हटले आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस