शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:27 PM

यशकथा :  या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

भारतात पूर्वी ४९ देशी गोवंश जाती होत्या. पैकी सध्या ४० जाती अस्तित्वात आहेत. यातील गीर, काँक्रेज, खिलारी अशा ६४ देशी गावरान गायींचा मुक्त गोठा अकोले तालुक्यातील कोकणेवाडी-धांदरफळ शिवारात एका उच्चशिक्षित तरुणाने तयार केला आहे. यात ८० रुपये लिटर दूध, तीन हजार रुपये किलो गावरान तूप अन् ३० रुपये लिटर ब्रह्ममुहूर्तावर धरलेल्या गोमूत्रातून त्यास चांगला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे. 

अकोले-संगमनेर रस्त्यालगत कोकणेवाडी-धांदरफळ शिवारातील शुभम् भास्कर घुले हा तरुण पुण्याच्या ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडला. पारंपरिक शेतीला पूरक जोडधंदा गोपालन करण्यासाठी त्याने राज्यातील व गुजरातमधील देशी गायीचे गोठे अभ्यासले. वडिलांच्या मार्गदर्शनाने चुलते सुदाम यांच्या सोबतीने पूर्वीच्या १९ जर्सी गायींच्या गोठ्याच्या आर्थिक कुबड्यांवर त्याने ‘निमाई’ नावाचा गोठा तयार केला. या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

जर्सी गायीच्या दुधात ‘हिस्टाडींन’असते, ते मानवी शरीरावर विपरीत परिणाम करू शकते.  तर गावरान देशी गायीच्या दुधात ‘प्रोलिटिंग’असते ते आरोग्यवर्धक असते. याचा अभ्यास करून त्याने साधारण ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांना एक गाय अशा ६४ गायी गुजरात राज्यातून आणल्या आहेत. ३ लाख रुपये किमतीचा ‘वळू’देखील गोठ्यात आहे. चारा काढणे, चारा घालणे, शेण काढणे, गायींची धार काढणे, गोमूत्र धरणे ही सर्व कामे हातानेच केली जातात. यंत्राने दूध काढले जात नाही. 

शुभमने सुरू केलेल्या या गोठ्यामुळे घरातील माणसांसह आजूबाजूच्या २०-२५ लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. गायींच्या कासाच्या आजाराचा प्रश्न असतो. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. मका, गुजरातमधून आणलेला सुका चारा, शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मणी, कडुलिंब व शेवग्याचा पाला, कॅल्शियम वाढीसाठी चुना, असा पोषक चारा गायींना दिला जातो. संस्कृत स्रोत संगीत ऐकवले जाते. यातून गोठ्याची शुद्धता व गोठ्याचे पावित्र्य जपले जाते.

एक गाय साधारण दहा लिटर दूध दोन वेळेला देते. ४.६ ते ५.०  दुधाला फॅट मिळते. सध्या १७५ लिटर दूध उत्पादित होत असून, ५० लिटर दूध संगमनेर शहरात विकले जाते. इतर दुधाचे पारंपरिक पद्धतीने तूप बनवले जात आहे. साधारण एक लिटर दूध निर्मितीला ५९ रुपये खर्च येतो. सध्या ८० रुपये लिटर दूध, ३ हजार रुपये किलो तूप, ३० रुपये लिटर गोमूत्र, ३ हजार रुपये टन शेण विकले जाते. 

१३ ते १४  वेतानंतर गाय भाकड होते. या गायींच्या सहवासात अर्धा तास राहिले तरी उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. शुद्धता पाळली, तर हा व्यवसाय कधीच तोट्यात जाणार नाही. तूप महाग असले तरी ग्राहकांना तुपासाठी प्रतीक्षा करावी लागते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसली आणि औषधासाठी तूप हवे असल्यास त्याला पैशांची सक्ती केली जात नाही, असे शुभम घुले यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी