शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 2:29 PM

कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

मतीन मणियार ।  मढी : पाथर्डी तालुक्यातून जाणारा कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील तीन वर्षात अपघातांमुळे जवळपास पावणे दोनशे मृत्यू  झाले आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.जमीन हस्तांतर होऊन २०१४ मध्ये कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी वेगात काम सुरू होते. पाथर्डी तालुक्यात हा महामार्ग करंजी घाट ते खरवंडी कासार असा ५० किलोमीटरचा आहे. १० मीटर रूंदी असणा-या रस्त्याचे काम जून २०१७ पूर्वीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, मागील पाच वर्षे कासवगतीने काम सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे रखडलेले रुंदीकरण काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खोदलेल्या तशाच आहेत. त्या ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी येथे महामार्ग प्रशासन व ठेकेदार संस्था यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. मात्र तरीही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यातही दुजाभाव दिसतो. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे कामही अर्धवट सोडून दिल्याचे दिसते. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, मढीचे बबन मरकड, चक्रधर ससाणे, गणेश कर्डिले, पिंटू परमार, शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप अकोलकर यांनी केली आहे.माझा एकुलता एक मुलगा या रस्त्यावरून रोज नगरला ये-जा करतो. रस्त्याची अवस्था बघता मुलगा सुखरूप घरी येईपर्यंत जीवाला काळजी लागलेली असते, असे करंजी येथील रहिवासी विमल अकोलकर यांनी सांगितले.

या कामाची ठेकेदार कंपनी आर. बी. के. ने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. लवकरच नियुक्त केलेला नवीन ठेकेदार काम सुरू करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :kalyanकल्याणroad safetyरस्ते सुरक्षा