शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 2:59 PM

यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

अहमदनगर : यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

दहावीचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ६९ हजार ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क््यांनी निकाल वाढला. म्हणजे यंदा जादा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी  सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरयंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ५५० विद्यार्थ्यांची आहे. सर्वाधिक ३४ हजार जागा विज्ञानसाठी एकूण ७६ हजार ६६० जागांपैकी ३४ हजार (४४.३५ टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर २९ हजार ६०० जागा कला शाखेसाठी, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी, तर २ हजार १२० जागा संयुक्त शाखेसाठी आहेत. 

विज्ञान शाखेत प्रवेश वाढणार नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ५० टक्क््यांच्या पुढे प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. दहावीत सुमारे ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील ५० टक्के म्हणजे ३३ हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तिच स्थिती असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण