शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

दुष्काळामुळे ऊस तोडणी मजूर दीडपटीने वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:07 AM

दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. दुष्काळामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत ऊस तोडणीसाठी जाणा-या मजुरांची संख्या दीड पटीने वाढली आहे.पाथर्डी तालुका हा दुष्काळी म्हणून राज्याला परिचित आहे. खरिपाची पिके हातात घेतल्यानंतर दसरा घरी साजरा करून तालुक्यातील सुमारे ४० ते ५० हजार मजूर दरवर्षी तोडणीसाठी राज्यातील तसेच परराज्यातील कारखान्यावर जातात. परंतु यंदा निसर्गराजा कोपल्याने खरीप आणि रब्बीही गेले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाºयाची स्थिती अत्यंत बिकट आहे. गावाकडे राहून करायचे काय? जगायचे कसे? या चिंतेने येथील मजूर ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे निघाले आहेत. तोडणी कामगारांच्या मजुरीत, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी संप पुकारलेला आहे. परंतु भाव वाढ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्या मिळते ते पदरात पाडून घेण्यासाठी मजूर कारखान्याकडे रवाना होत आहेत. दरवर्षी मुकादम मजुरांकडे जाऊन कारखान्यावर जाण्यासाठी प्रयत्न करत. यावर्षी ‘मिळेल त्या उचलीवर’ मजूर कारखान्यावर जायला तयार झाला आहे. ‘काही मजूर तर आम्हाला घेऊन जा’ असे म्हणत मुकादमांकडे विनवणी करीत असल्याचे चित्र आहे.नेते पातळीवर तोडणी कामगारांचा संप सुरू असला तरी याबाबत मात्र कोणताही नेता काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे पुढच्या दिवसांची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे मजूर संसाराला लागणाºया चीज वस्तूंची एखादी पेटी, लहान बापडे, अंगावर फाटकी चादर, काही मात्र ट्रॅक्टरवर उघड्यावर बसून जनावरांना घेऊन जात असल्याचे चित्र दिसते. तोडणी कामगारांची ही बि-हाडं डांबरी रस्त्यावरून तळपत्या उन्हात कारखान्याकडे निघाली आहेत.अकोले (ता.पाथर्डी) येथील ऊस तोडणी मजूर वर्षा गिरी म्हणाल्या, चालूवर्षी फारच बेकार दिवस आले आहेत. गावाकडे कसे जगायचे हा प्रश्न आहे. आम्हालाच खायला नाही, तर जनावरांना कोठून आणणार, प्यायलाही काही दिवसांनी पाणी राहणार नाही. कारखान्यावर जाऊन कसे तरी सहा महिने काढू, असे त्यांनी सांगितले.मजूर कारखान्यावर गेल्याने गावामध्ये वृद्ध, शाळकरी मुले राहतात. त्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागणार आहे. सध्या वीस ते तीस टक्के मजूर कारखान्यावर गेले आहेत.ऊसतोड मजुरी वाढीबाबत साशंकता..ऊसतोड मजूर, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी विविध संघटनांनी संप पुकारलेला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाववाढ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तालुक्यातील खरवंडी येथील मेळाव्यात जाहीर केले होते. परंतु त्यानंतर सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मुंडे यांनी मजुरांच्या हातातील कोयता खाली घेण्यासाठी झटणार असल्याचे जाहीर केले. परंतु मजूर व मुकादमांच्या कमिशन वाढीबाबत चकार शब्द काढला नसल्याने भाववाढीचे काय होणार असा प्रश्न मजुरांसमोर आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी