शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:25 AM

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने ...

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने शेतीमाल सडला. नंतर रोगराईने उत्पन्नाच्या आशाही धुळीस मिळाल्या. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

दुष्काळी नगर तालुक्यात रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उत्पादन घेतले जाते. कायमस्वरूपी दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठा आनंद झाला. पाणी टंचाई हटणार, उत्पादन वाढणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या. मात्र अतिपाऊस, रोगराई, विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. अतिपावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे शेत उपाळल्याने कांदा रोपे, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, मूग आदी पिके शेतातच सडली. त्यामुळे खरीप पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली

...

विजेचा खेळखंडोबा सुरूच

नगर तालुक्यातील पिके महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणी आहे. मात्र गावोगावी वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त रोहित्र बदलण्यास महावितरणचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. अनेक ठिकाणी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या वीज रोहित्रामुळे पाणी असूनही पाण्याअभावी शेत पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जळणारी पिके पाहवत नसल्याने शेतकऱ्यांकडून डिझेल इंजिनचा पिकांना पाणी देण्यासाठी वापर केला जात आहे. वाढलेले डिझेलचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

....

फळांचीही गळ वाढली

संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा फळांना सततच्या ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

....

पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांसमोरील संकट दूर होत नाही. अति पावसाने पीक मातीमोल झाली. रब्बीतील पिकांना रोगाने ग्रासले. त्यात भर म्हणून विजेचे संकट निर्माण झाले आहे. वारंवार रोहित्र जळत आहे. जळालेले रोहित्र महावितरण वेळेवर दुरुस्त करून देत नाही. पाणी मुबलक आहे, पण वीज नाही. शेतकरी नादुरूस्त रोहित्र बदलण्याची मागणी महावितरणकडे करत आहेत.

-तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी, नगर तालुका.