शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय दुर्दैवी-थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:10 AM

सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशाचे व महाराष्ट्राच्ेो आराध्य दैवत आहे. लोकशाहीची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनीच रुजवली. गडकिल्ले हे सर्वांचे स्फुर्तीस्थान असून तेच गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी व चुकीचा आहे. या सरकारने या निर्णयामधून काय साधले आहे, हे कळत नाही. गड-किल्ले भाड्याने देऊन त्यामधून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. हे सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत दु:खदायक आहे. खरे तर काम करण्यासाठी सरकारला खूप मोठा वाव होता परंतु त्यांनी जाणीवपूर्वक महत्त्वांच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील शेतकरी मोठा अडचणीत आहे. हजारो कंपन्या बंद पडत असून अनेक लोक बेरोजगार होत आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी आली आहे. याबाबत उपाययोजना शोधण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द््यांच्या आधारे राजकारण करू पाहत आहे. फक्त जाहिरातबाजी करायची व प्रसिद्धी मिळवायची असे या सरकारचे काम असून हे सरकार सर्व पातळीवर अत्यंत अपयशी ठरले आहे.  ऐतिहासिक गड किल्ल्यांवर हॉटेल निर्माण होऊन विविध समारंभामुळे तेथील पवित्रता धोक्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचेही प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.

टॅग्स :Fortगडcongressकाँग्रेस