शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळेच हवामानात बदल : तज्ज्ञांचा सूर

By अनिल लगड | Published: September 02, 2018 3:43 PM

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.

अनिल लगडअहमदनगर : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. भूकंपासारख्या विनाशकारी आपत्तीचा सामना करण्यासाठी भविष्यात नागरिकांनी सावधगिरी व जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ, संशोधकांनी भूकंप आणि हवामानबदलावर अभ्यास करण्याची गरज आहे. पृथ्वीचे वाढत्या तापमानामुळे हवामानात बदल निर्माण होऊन भूकंप, अतिृवष्टी, दुष्काळासारखे संकट ओढावले असल्याचे मत जिल्ह्यातील तज्ज्ञांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.भूगर्भातील हालचाली, पृथ्वीच्या तापमानातील होत असलेले वाढ हेच भूकंप, पूर, अतिवृष्टीला कारणीभूत आहेत. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे हा यावर उपाय आहे, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणातील बिघाड यामुळे घारगावसारखे भूकंपाचे धक्के बसत आहेत. महाराष्टÑ देखील काही ठिकाणी अतिवृष्टी तर कुठे दुष्काळीस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील खनिजांवर परिणाम होऊन हे वातावरणीय बदल घडत आहे. सी-लेव्हलमध्ये फरक पडत असून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.- सुधीर फडके, भूगर्भाचे अभ्यासक, अहमदनगरभूगर्भातील घडामोडींमुळे वातावरण बदल होतात. या बदलांमुळे भूकंप, पाऊस पडतो. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जागतिक पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. त्याचप्रमाणे पावसावर देखील परिणाम होतो. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळीस्थिती निर्माण होते. याचा परिणाम शेतीवर होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत आहे. यासाठी निसर्गाबरोबर मानवाने देखील बदल स्वीकारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पिके घेण्याच्या प्रयत्न करावा. जेणेकरून शेतक-यांचे नुकसान टळेल.-डॉ.थॉमस पडघडमल, वॉटरशेड, व्यवस्थापक, आॅर्गनायझेशन ट्रस्ट, सामाजिक विभाग, अहमदनगर.७० लक्ष, दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीपासून महाराष्टÑातील पठारभाग तयार झाला आहे. पूर्वी या पठारांची उंची खूप होती. परंतु अतिवृष्टीमुळे व नद्यांच्या जाडीमुळे व ठिकठिकाणी तडे गेल्याने पठारांची उंची कमी होत गेली. त्यामुळे १९६७ पासून महाराष्टÑात भूकंपाचे धक्के बसू लागले. प्रथम कोयना, खर्डी, लातूर परिसरात भूकंप झाला. गेल्या काही दिवसापासून घारगाव, बोटा परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. यासाठी नागरिकांनी आरसीसी किंवा पत्र्यांच्या घरात वास्तव्य करावे. जेणे करुन हानी होणार नाही.-प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ, अहमदनगर.पृथ्वीच्या पोटातून रोज अब्जावधी लिटर डिझेल, पेट्रोलचा उपसा होत आहे. यामुळे भूर्गातील हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत जगातील भूगर्भ शास्त्रज्ञ कित्येक दिवसापासून सांगत आहेत. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. देशात रोज करोडो वाहने धावतात. त्याच्या कार्बनडायआॅक्साईडचा परिणाम होत आहे. हेच खरे ग्लोबल वॉर्निंगचे कारण आहे. यामुळेच बोटा, घारगावसारखे भूकंपाचे धक्के बसतात. याचा परिणाम हवामान बदलावर होऊन कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ पडत आहे. मी ‘भूकंपाचे धक्के’ हे पुस्तक लिहिले आहे. याबाबत दीड वर्षापूर्वी घारगाव परिसरात अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच यांना पुस्तके मोफत वाटून जनजागृती केली होती. हे टाळायचे असेल तर पर्यावरणाचा समतोल राखणे हाच उपाय आहे.-सुधाकर केदारी, भूकंपाचे अभ्यासक, नगर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत