शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी राज्याची तिजोरी खुली केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 2:02 PM

शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही.

नेवासा : शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. कपाशी बोंडअळीचे नुकसान दिले आहे. आमच्या ४ वर्षाच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त खरेदी आम्ही केली. शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी राज्याची तिजोरी आम्ही खुली केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या पवित्र स्थानी शेतकरी-वारकरी एकत्र आले आहेत. शेतकरी हा वारकरी आहे आणि वारकरी हा शेतकरी आहे. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे.या महाराष्ट्रात शेतक-यांच्या समस्या मोठ्या आहेत. सध्या दुष्काळ समोर आहे. मात्र आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे. हे मागील कोणत्याही सरकार करू शकले नाही. कर्जमाफी योजनेमध्ये एकट्या नगर जिल्ह्यात साडेतेराशे कोटी रुपये मिळाले. राज्यात २१ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून दिले. हे कोणत्याही सरकार करू शकले नाही.आजही आम्ही कर्जमाफी योजना थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. आज बोंडअळीचे नुकसान दिले आहे. जलयुक्त शिवार योजना राबविली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. शेतक-यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही काम केले. दुधाचे भाव आम्ही वाढविले. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही.तत्पुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनी दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शेतकरी-वारकरी महासंमेलानाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे होते.याआधीच्या सरकारमधील नेतेच गब्बर झालेआमच्या कोणतयाही संस्था नाहीत. आम्हाला जनतेसाठी राज्य करायचे आहे. प्रामाणिकपणे काम आम्ही करत आहोत. याआधीच्या सरकारने जनतेची चेष्टा केली. स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या. जनतेच्या जीवावर स्वत: मोठे झाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस