शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:21 AM

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

अकोले : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या मागे जनता आहे, पण त्यांचे नेते हतबल झाले आहेत. आपण भाजपपासून दूर गेल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या अगदी गळ्यात गळे घातले नाहीत पण राजकियदृष्ट्या त्यांच्या अधिक जवळ गेलोय! हे अगदिच असत्य नाही असे स्पष्ट करत ‘सनातन’वर बंदी घालावी, अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.नाशिक-पुणे प्रवासाच्या दरम्यान खासदार शेट्टी यांनी इंदोरी-रुंभोडी या गावांना भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष साथी दशरथ सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संवाद साधला.‘मोदी’ हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी ‘अच्छे दिन’ या गोंडस शब्दांना आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जोड देवून सत्ता मिळवली. मोदी करतील असे अभास निर्माण झाला होता. आता ही जादू विरली आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील तरुणाईचा उन्माद दिसला पण तो फार काळ टिकून राहीलेला नाही.त् ासेच ‘भाजप’च्या तालीबानी विचारांचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही. लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही. विचाराच्या पातळीवर भाजप लढाई करत नाही. शारीरिक हल्ल्यांपर्यंत त्यांची मजल गेली आहे. महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा भाजपाचा घाट जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महात्मा गांधीचे विचारच देशाला तारणहार ठरत आहेत. पुरोगामीत्व टिकवण्याची जबाबदारी कॉग्रेस - राष्ट्रवादीची असून आता त्यांना प्रतिगाम्यांशी लढण्यासाठी आमच्या सारख्या पुरोगामी संघटनांच्या मदती शिवाय पर्याय नाही. शहरांना सूज येत असून खेडी ओस पडत चालली आहे. कष्टकरी श्रमीकांच्या उध्दारासाठी सघंटना बळकट व्हायला हवी. विवेकशून्य लोक तरुणाईची माथी भडकवण्याच काम करतायेत,हे थांबवायला हवं. चळवळीची दिशा भरकटू नये, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी सजग रहायला हवं, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलं.चळवळी भरकटू नयेतनगर जिल्ह्याने राज्याच्या शेतकरी कामगार चळवळीला विचार व नेतृत्व दिलं. साखर सम्राटांच्या उदयामुळे ते लुप्त झालं होतं. सहकारातून वैचारीक गुलामगिरी वाढली होती. आता पुन्हा एकदा ‘दूध व ऊस’ आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चळवळ बाळसं धरु लागली आहे. चळवळी भरकटू नये म्हणून त्या योग्य माणसांच्या हातात जायला हव्यात, त्यासाठी सप्टेंबर मधे कृती कार्यक्रम घेवू असे खासदार शेट्टी यांनी सावंत यांचे घरी कार्यकर्त्यां मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, हंसराज वडगुले, नाना बच्छाव, सागर पिंपरगे, भाऊसाहेब चासकर, भानुदास हासे, बबन नवले, परबत नाईवाडी, रमेश जगताप, पोपट सावंत, प्रकाश मालुंजकर, सुभाष येवले, चंद्रकांत नेहे, डॉ.रविंद्र सावंत उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले