शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना पॅकेज हवे; नगरमध्ये कारखानदारांची गुप्त बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 4:21 PM

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

अहमदनगर : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमधील विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या परिसरात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे साखर कारखानदार उपस्थित होते.

अतिशय गोपनीय झालेल्या या बैठकीत फक्त कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचाच विषय होता. या बैठकीला माजीमंत्री राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राहुल कूल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १५ साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अनेक कारखान्यांवर बँकांचे कर्ज आहे. लॉकडाऊननंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, याची शक्यता नाही. या कारखान्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा व्यर्थ आहे. त्यामुळे कारखान्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळण्याची गरज आहे, याची बैठकीत चर्चा झाली. याबाबतचे एक अंदाजपत्रक निश्चित करण्यासाठी दानवे यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली.  प्रस्ताव तयार केल्यानंतर तो अर्थमंत्रालयाला सादर केला जाणार आहे. विशेषत: जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत, अशा आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचे साखर कारखान्यांचाच विषय बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे जे सध्या भाजपात आहेत, असेच कारखानदार बैठकीला उपस्थित होते.

साखर कारखान्यांसह रोजगार, राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. हे प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी या बैठकीत दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने