शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

‘बिहार पॅटर्न’ने जगविली तीनशेहून अधिक झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 4:29 PM

भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत.

राजूर : भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही ग्रामपंचायत आणि रोजगार सेवक यांच्या योग्य नियोजनामुळे हरितग्रामकडे वाटचाल करत असलेला जामगाव येथील उपक्रम इतर गावांना दिशादायक ठरेल असाच आहे.दोन वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत जामगाव येथे या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा करंज, शिसव, काशीद, बदाम, बॉटल पंप व काही शोभेची अशी विविध प्रकारची चारशे झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.सुरवातीला या झाडांना शेणखत देण्यात आले, यानंतर नियमितपणे पाणी घालणे,झाडांच्या संरक्षनासाठी कूंपण तयार करणे, आळे तयार करून त्यातील तन काढणे आदी कामे या अंतर्गत येत असतात.गावातील सुरवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत व गावअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा काही झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांची मर झालेली असली तरी चारशे पैकी तीनशे चाळीस झाडे आजही हिरवीगार आहेत.शेवटच्या टोकाला लावण्यात आलेली झाडे मुरमाड जागेवर असल्याने त्यांची वाढ काहीशी कमी आहे. मात्र गावातील झाडांची वाढ चांगली झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांना शेणखत टाकणे, आळे हलवून घेणे आदी करावयाचे कामांची माहिती रोजगार सेवक यांना दिली आहे.त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील वर्षात या झाडांची वाढ चांगली होईल, असा आशावाद पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. कोकतरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले