शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जागरुक राहा : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 3:10 PM

आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. द्विवेदी यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महिला संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी, त्याअनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थितीची माहिती घेतली. अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आदींनी अशा प्रकाराबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अठरा वर्षे वयाखालील मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे याबाबत शालेय पातळीवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्ह्यात विविध ठिकाणी आस्थापनांवर बालकामगार असतील तर अशा आस्थांपनांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या बालकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व गोविंद दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय