शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

‘मन की बात’वेळी वाजविल्या टाळ्या-थाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:12 AM

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी, तसेच दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून टाळ्या-थाळ्या वाजविण्यात ...

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी, तसेच दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून टाळ्या-थाळ्या वाजविण्यात आल्याचे समाजवादी जनपरिषदेच्या नेत्या ॲड. निशा शिवूरकर यांनी सांगितले. दिल्लीतील सुरू असलेल्या किसान आंदोलनाला २५ डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या ३४ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र, तरीही केंद्र सरकार आपली भूमिका बदलण्यास तयार नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांपेक्षा अदानी, अंबानी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित पाहत आहे. कामगार, सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांच्याशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आणि देशातील सर्वच राज्यांतील शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी किसान आंदोलनाची बदमानी करीत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी, सरकारला जाग येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी टाळ्या-थाळ्या वाजविण्यात आल्याचे ॲड. शिवूरकर यांनी सांगितले.

किसान संघर्ष समितीचे संगमनेर तालुक्याचे संयोजक शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, अनिल कढणे, शांताराम गोसावी, इंदुमती घुले, दशरथ हासे, ॲड. अनिल शिंदे, अशोक डुबे, संगीता राक्षे, मनीष राक्षे आदी यात सहभागी झाले होते.

..............

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण होऊनही केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. केंद्र सरकार शेतकरीविरोधी आहेच; परंतु हे सरकार कामगारविरोधीदेखील आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, कामगार देशोधडीला लागतील, अशी भीती वाटत आहे.

-ज्ञानेश्वर राक्षे, जिल्हाध्यक्ष मातंग एकता आंदोलन, अहमदनगर

-------------

फोटो नेम : २७१२२०२० टाळ्या-थाळ्या, संगमनेर (दोन फोटो)

ओळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी किसान संघर्ष समितीच्या वतीने टाळ्या-‌थाळ्या वाजवीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.