शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

सरकारच्या भुमिकेवर अण्णा हजारे समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:47 AM

आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराळेगणमध्ये विजयी ग्रामसभा

राळेगण सिद्धी : आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.नवी दिल्ली येथील आपले सात दिवसीय उपोषणानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे परतल्या नंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सायंकाळी राळेगण सिध्दीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली विजयी ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.यावेळी अण्णा हजारे म्हणाले, शासन नुसतेच घोषणा करते, पण अमंलबजावणी करत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. रामलिला मैदानावरील आंदोलनातून सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. काही मागण्याना वेळ लागणार त्या मागण्याना वेळ लागला तरी चालेल पण जे शक्य असणाऱ्या मागण्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.या वेळी सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेष औटी, मा. सदाशिव मापारी, मा.सरपंच जयसिंग मापारी, मा.सरपंच मंगल मापारी,निलेश लंके, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनिल हजारे, डॉ. धनंजय पोटे, डॉ. गणेश पोटे, संजय वाघमारे, सबाजी गायकवाड, राहुल शिंदे, रमेश औटी, शरद मापारी, सुरेश पठारे, सुभाष पठारे, कैलास गाडीलकर, अरुण भालेकर, भीमराव पोटे, सावळेराम पठारे, भाऊसाहेब लटांबळे, निवृत्ती मापारी, सोमनाथ दिवेकर, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, दादाभाऊ गाजरे, कांतीलाल औटी, विलास औटी, गणेश भोसले, महेंद्र गायकवाड, डॉ. राहुल पोटे, प्रभू मापारी, संगिता मापारी, हिराबाई पोटे, प्रभावती पठारे, दत्ता आवारी, कौशल्या हजारे, मंदा पठारे, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई नवले, पुष्पा गाजरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या ग्रामसभेत आंदोलनात सहभागी होणा-या कार्यकर्ते व शेतकºयांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने दुर्लक्ष केले तरी वृत्तपत्रांनी चांगले वार्तांकन केल्याबद्दल केल्याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन करणारा ठराव समंत करण्यात आला.पंतप्रधान, मंत्री , खासदार, अधिकारी व कर्मचारी लोकपालच्या कक्षेत येतात. त्यामुळे, हे सरकार लोकपालच्या नियुक्तीला सरकार घाबरते आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेParnerपारनेर