शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अहमदनगर शहर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:39 PM

मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अहमदनगर : मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मागील निवडणुकीत अंतर्गत रस्त्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही़ वाडियापार्क क्रीडासंकुलाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. तसेच शहरातील मोठी अतिक्रमणे अजूनही तशीच आहेत.आमदाराचे नाव : संग्राम जगतापमतदारसंघ : अहमदनगर शहरटॉप 5 वचनं1 रोजगार निर्मिती2 सीना नदी सुशोभिकरण3 झोपडपट्टीमुक्त नगर4 विकास आराखड्याप्रमाणे रस्ते विकास5 कचरा खत प्रकल्पवचनांचं काय झालं?1 एमआयडीसीतील बंद आयटी पार्क सुरू2 सीना सुशोभिकरणाचा प्रस्ताव लालफितीत3 रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित4 वाहतुकीचा प्रश्न जैसे थे5 कचरा विल्हेवाटीची अद्याप प्रतीक्षाहे घडलंय...1 बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात नवीन मशिनरी2 तपोवन, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी3 केडगाव लिंक रोडचे काम पूर्ण4 सीना नदी पात्राचे रुंदीकरण5 प्रमुख चौकांत हायमास्टचा प्रकाशहे बिघडलंय...1 नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम2 भूसंपादनामुळे तपोवन रस्त्याच्या कामात अडचणी3 उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू नाही4 नाट्यगृहाचे भिजत घोंगडे कायमविधीमंडळातील कामगिरीसंग्राम जगताप सांगतात, अधिवेशनात गेल्या पाच वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित केले. सीना नदीपात्राचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे काढून पात्र रुंद केले. उड्डाणपुलाचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कार्यवाही सुरू आहे.विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी आपण सभागृहात वारंवार केली आहे.एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन उद्योगांकरीता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. - अशोक सोनवणे, संस्थापक , आमी संघटना, नागापूरगेल्या पाच वर्षात रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत. बंद पडलेला आयटी पार्क सुरू झाला. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नगर- पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास नगरचा विकास आपोआप होईल. - प्रा. बी. एन. शिंदेका सुटले नाहीत प्रश्न?केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधी मिळविण्यात अडचणी आल्या. झोपडपट्टी मुक्त शहरासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न केंद्राशी संबंधित असल्याने तो सुटला नाही. सीना नदी सुशोभिकरणाच्या दृष्टीने पात्र रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, असे जगताप यांनी सांगितले.1 मूलभूत सेवा सुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेला १० कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त.2 शहर स्वच्छतेसाठी शासनाकडून मिळालेला3 - २७ कोटींचा निधी महापालिकेत पडून आहे.2019 मध्ये शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. मात्र पाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.पाच वर्षांत काय केलं?मागील पाच वर्षात मतदारसंघात बुरुडगाव, केडगाव लिंक रोड, सीना नदी पात्राचे रुंदीकरण, यासारखी कामे करण्यात आली. तसेच तपोवन रस्ता, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांत जावे लागते. त्यांना नगर शहरातच रोजगार मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो़ त्याला यश आले. नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला आयटी पार्क सुरू करण्यात आला असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.मतदारसंघातील रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत आणला. याशिवाय आमदार स्थानिक विकास निधीतून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, प्रमुख चौकांत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना आजही चिखलातून प्रवास करावा लागत आहे.मतदार संघाला काय हवंउद्योगांसाठी पोषक वातावरणतरुणांना हव्यात रोजगाराच्या संधीनियमित कच-याचे संकलनहद्दवाढीतील उपनगरांत पायाभूत सुविधासुरक्षित वाहतूक व्यवस्थात्यांना काय वाटतं?मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली़ औरंगाबाद- मनमाड रस्त्याला जोडणाºया तपोवन रस्त्याचे काम गेल्या २५ वर्षांपासून रखडले होते़ शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले़ पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी रोजगार उपलब्ध करून देण्याचे एक आश्वासन दिलेले होते़ त्यासाठी गेल्या १९ वर्षांपासून बंद असलेला आयटी पार्क सुरू केला़ पहिल्या टप्प्यात ७ ते ८ आयटी कंपन्या नगरमध्ये आल्या आहेत़ इतरही काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे़ - संग्राम जगताप, आमदार

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेस