शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

खरिपाची लगबग

By admin | Updated: October 15, 2024 05:48 IST

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यंदा या पिकाच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. कृषी विभागाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ५ हजार मेट्रिक टन रासायनीक खते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा झालेला आहे. यंदाच्या हंगामात सर्वात मोठा प्रश्न सोयाबीन पिकाचा आहे. गत वर्षी या पिकाचे उत्पादन घटल्याने यंदा बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभाग सोयाबीनचे जास्तीतजास्त बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात सोयाबीनेच सरासरी क्षेत्र ६० हजार क्षेत्र असून त्यासाठी ४० हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यापैकी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांकडून १६ हजार क्विंटल आणि शेतकर्‍यांकडून ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. कृषी विभाग जास्तीतजास्त २२ हजार क्विंटल पर्यंत बियाणे उपलब्ध करू शकतो. मात्र, उर्वरित १३ हजार क्टिंलचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यात कपाशी पिकाचे क्षेत्र कमी झाल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळणार आहेत. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांची धावपळ सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कपाशी बियाण्याची ४ लाख ८० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. यात महिको कनक या लोकप्रिय वाणाच्या १ लाख ९० हजार पाकिटांचा समावेश राहणार आहे. पीक निहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) भात १२ हजार ५००, बाजरी १ लाख ७० हजार, नागली २ हजार ७००, मका ५२ हजार हेक्टर, तृणधान्य २ हजार १००, तूर १२ हजार १००, मुग १५ हजार २००, उडीद ५ हजार ५००, भूईमूग ४ हजार ६००, खुरसणी २ हजार २००, तीळ ५०० , सुर्यफुल ४ हजार २००, सोयाबीन ६० हजार, कापूस १ लाख ३० हजार, आणि ऊस १ लाख १४ हजार २००.