शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

खरिपाची लगबग

By admin | Updated: October 15, 2024 05:48 IST

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यंदा या पिकाच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. कृषी विभागाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ५ हजार मेट्रिक टन रासायनीक खते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा झालेला आहे. यंदाच्या हंगामात सर्वात मोठा प्रश्न सोयाबीन पिकाचा आहे. गत वर्षी या पिकाचे उत्पादन घटल्याने यंदा बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभाग सोयाबीनचे जास्तीतजास्त बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात सोयाबीनेच सरासरी क्षेत्र ६० हजार क्षेत्र असून त्यासाठी ४० हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यापैकी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांकडून १६ हजार क्विंटल आणि शेतकर्‍यांकडून ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. कृषी विभाग जास्तीतजास्त २२ हजार क्विंटल पर्यंत बियाणे उपलब्ध करू शकतो. मात्र, उर्वरित १३ हजार क्टिंलचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यात कपाशी पिकाचे क्षेत्र कमी झाल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळणार आहेत. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांची धावपळ सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कपाशी बियाण्याची ४ लाख ८० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. यात महिको कनक या लोकप्रिय वाणाच्या १ लाख ९० हजार पाकिटांचा समावेश राहणार आहे. पीक निहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) भात १२ हजार ५००, बाजरी १ लाख ७० हजार, नागली २ हजार ७००, मका ५२ हजार हेक्टर, तृणधान्य २ हजार १००, तूर १२ हजार १००, मुग १५ हजार २००, उडीद ५ हजार ५००, भूईमूग ४ हजार ६००, खुरसणी २ हजार २००, तीळ ५०० , सुर्यफुल ४ हजार २००, सोयाबीन ६० हजार, कापूस १ लाख ३० हजार, आणि ऊस १ लाख १४ हजार २००.