शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची लगबग

By admin | Updated: October 15, 2024 05:48 IST

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यंदा या पिकाच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. कृषी विभागाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ५ हजार मेट्रिक टन रासायनीक खते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा झालेला आहे. यंदाच्या हंगामात सर्वात मोठा प्रश्न सोयाबीन पिकाचा आहे. गत वर्षी या पिकाचे उत्पादन घटल्याने यंदा बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभाग सोयाबीनचे जास्तीतजास्त बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात सोयाबीनेच सरासरी क्षेत्र ६० हजार क्षेत्र असून त्यासाठी ४० हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यापैकी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांकडून १६ हजार क्विंटल आणि शेतकर्‍यांकडून ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. कृषी विभाग जास्तीतजास्त २२ हजार क्विंटल पर्यंत बियाणे उपलब्ध करू शकतो. मात्र, उर्वरित १३ हजार क्टिंलचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यात कपाशी पिकाचे क्षेत्र कमी झाल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळणार आहेत. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांची धावपळ सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कपाशी बियाण्याची ४ लाख ८० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. यात महिको कनक या लोकप्रिय वाणाच्या १ लाख ९० हजार पाकिटांचा समावेश राहणार आहे. पीक निहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) भात १२ हजार ५००, बाजरी १ लाख ७० हजार, नागली २ हजार ७००, मका ५२ हजार हेक्टर, तृणधान्य २ हजार १००, तूर १२ हजार १००, मुग १५ हजार २००, उडीद ५ हजार ५००, भूईमूग ४ हजार ६००, खुरसणी २ हजार २००, तीळ ५०० , सुर्यफुल ४ हजार २००, सोयाबीन ६० हजार, कापूस १ लाख ३० हजार, आणि ऊस १ लाख १४ हजार २००.