शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

खरिपाची लगबग

By admin | Updated: October 15, 2024 05:48 IST

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यंदा या पिकाच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. कृषी विभागाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ५ हजार मेट्रिक टन रासायनीक खते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा झालेला आहे. यंदाच्या हंगामात सर्वात मोठा प्रश्न सोयाबीन पिकाचा आहे. गत वर्षी या पिकाचे उत्पादन घटल्याने यंदा बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभाग सोयाबीनचे जास्तीतजास्त बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात सोयाबीनेच सरासरी क्षेत्र ६० हजार क्षेत्र असून त्यासाठी ४० हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यापैकी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांकडून १६ हजार क्विंटल आणि शेतकर्‍यांकडून ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. कृषी विभाग जास्तीतजास्त २२ हजार क्विंटल पर्यंत बियाणे उपलब्ध करू शकतो. मात्र, उर्वरित १३ हजार क्टिंलचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यात कपाशी पिकाचे क्षेत्र कमी झाल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळणार आहेत. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांची धावपळ सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कपाशी बियाण्याची ४ लाख ८० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. यात महिको कनक या लोकप्रिय वाणाच्या १ लाख ९० हजार पाकिटांचा समावेश राहणार आहे. पीक निहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) भात १२ हजार ५००, बाजरी १ लाख ७० हजार, नागली २ हजार ७००, मका ५२ हजार हेक्टर, तृणधान्य २ हजार १००, तूर १२ हजार १००, मुग १५ हजार २००, उडीद ५ हजार ५००, भूईमूग ४ हजार ६००, खुरसणी २ हजार २००, तीळ ५०० , सुर्यफुल ४ हजार २००, सोयाबीन ६० हजार, कापूस १ लाख ३० हजार, आणि ऊस १ लाख १४ हजार २००.