शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

पाण्याचे टँकर बंद केल्याने जि.प. अध्यक्षा संतप्त

By admin | Updated: August 5, 2016 23:43 IST

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही.

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात शासनाने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ग्रामीण भागात यामुळे पाणीबाणी निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने पाण्याचे टँकर सुरू होते. उन्हाळ्यात हा आकडा ७५० च्या पुढे गेला होता. दरम्यान, जुलै महिन्यात झालेले पावसाने जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या ३०५ पर्यंत खाली आली होती. शासनाने ३० जून ते २१ जुलैपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्ह्यात सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध झाले की नाही, याची खातरजमा न करताच पाण्याचे सर्व टँकर बंद केले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भू गर्भातील पाणीसाठा न वाढल्याने पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अध्यक्षा गुंड संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तातडीने शासनाला अहवाल देवून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणारे टँकरपारनेर ८७, श्रीगोंदा ७५, कर्जत ४५, संगमनेर ३९, नगर ३०, जामखेड २०, नेवासा ३, राहाता ३, राहुरी २, पाथर्डी १ यांचा समावेश आहे. शासन पाण्याचे टँकर सुरू करतांना तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्त पाहणी करण्यास सांगते. मग बंद करतांना या दोघांनी एकत्र पाहणी करून टँकर बंद करावेत, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.