शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

पाण्याचे टँकर बंद केल्याने जि.प. अध्यक्षा संतप्त

By admin | Updated: August 5, 2016 23:43 IST

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही.

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात शासनाने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ग्रामीण भागात यामुळे पाणीबाणी निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने पाण्याचे टँकर सुरू होते. उन्हाळ्यात हा आकडा ७५० च्या पुढे गेला होता. दरम्यान, जुलै महिन्यात झालेले पावसाने जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या ३०५ पर्यंत खाली आली होती. शासनाने ३० जून ते २१ जुलैपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्ह्यात सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध झाले की नाही, याची खातरजमा न करताच पाण्याचे सर्व टँकर बंद केले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भू गर्भातील पाणीसाठा न वाढल्याने पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अध्यक्षा गुंड संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तातडीने शासनाला अहवाल देवून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणारे टँकरपारनेर ८७, श्रीगोंदा ७५, कर्जत ४५, संगमनेर ३९, नगर ३०, जामखेड २०, नेवासा ३, राहाता ३, राहुरी २, पाथर्डी १ यांचा समावेश आहे. शासन पाण्याचे टँकर सुरू करतांना तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्त पाहणी करण्यास सांगते. मग बंद करतांना या दोघांनी एकत्र पाहणी करून टँकर बंद करावेत, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.