शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच

By सुधीर लंके | Updated: October 27, 2018 10:46 IST

राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

सुधीर लंकेअहमदनगर: राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. जायकवाडीला पाणी जाते, पण पाथर्डीत पाणी पोहोचत नाही यामुळे पाथर्डी तालुक्यातील ही गावे आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. देशातील हा सर्वात महत्त्वांकाक्षी प्रकल्प यामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे.मुळा धरणातील पाण्याचा राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील ज्या अवर्षणप्रवण भागाला लाभ होत नाही तेथे धरणातून पाईप कालव्याद्वारे (वांबोरी चारी) पाणी देण्याचा निर्णय झाला. माजी खासदार बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात सुरुवातीला १९९०-९१ मध्ये बैठक घेतली होती. या योजनेला १९९९ साली मंजुरी मिळून ती २०११ साली कार्यान्वित झाली.५९ किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे धरणातील पाणी या चार तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ तलावांमध्ये सोडले जाते. तलावातील पाणी जमिनीत पाझरुन या भागात अप्रत्यक्ष सिंचन होईल, अशी ही योजना आहे. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ती सक्षमपणे चाललेली नाही. इतर कालव्यांना ज्या पद्धतीने नियमित आवर्तन सोडले जाते. तसे आवर्तन या चारीला दिले जात नाही. त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड येतात किंवा मध्येच पाण्याची चोरी होते, अशी पाथर्डी तालुक्यातील गावांची तक्रार आहे. योजनेचे लाभार्थी असलेल्या कौडगाव आठरे, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, खांडगाव, जोहारवाडी, मढी, घाटशिरस, तिसगाव, देवराई, त्रिभूवनवाडी, शिरापूर, निंबोडी, करडवाडी, खंडोबाचीवाडी, कान्होबाचीवाडी, वैजूबाभूळगाव या गावांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असून आमच्या भागातील तलाव न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या योजनेसाठी सातत्याने लढा देणारे बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मणियार, अरुण आठरे, संभाजी वाघ, राजेंद्र पाठक, प्रभाकर आठरे, भगवान मरकड, दादासाहेब चोथे, अभिजित शिंदे, सुरेश पवार, रावसाहेब गुंजाळ, विजय कारखेले यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. अगोदर अंतिम टप्प्यातील तलाव भरले जावेत. नंतर योजनेच्या प्रारंभिक टप्यातील तलावांत पाणी सोडावे, अशी या गावांची मागणी आहे. प्रशासन जाणीवपूर्वक याकडे व वरील पाणीचोरीकडे दुर्लक्ष करते, अशीही शेतकºयांची तक्रार आहे.

(क्रमश:)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPathardiपाथर्डीahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय