शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच

By सुधीर लंके | Updated: October 27, 2018 10:46 IST

राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

सुधीर लंकेअहमदनगर: राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. जायकवाडीला पाणी जाते, पण पाथर्डीत पाणी पोहोचत नाही यामुळे पाथर्डी तालुक्यातील ही गावे आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. देशातील हा सर्वात महत्त्वांकाक्षी प्रकल्प यामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे.मुळा धरणातील पाण्याचा राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील ज्या अवर्षणप्रवण भागाला लाभ होत नाही तेथे धरणातून पाईप कालव्याद्वारे (वांबोरी चारी) पाणी देण्याचा निर्णय झाला. माजी खासदार बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात सुरुवातीला १९९०-९१ मध्ये बैठक घेतली होती. या योजनेला १९९९ साली मंजुरी मिळून ती २०११ साली कार्यान्वित झाली.५९ किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे धरणातील पाणी या चार तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ तलावांमध्ये सोडले जाते. तलावातील पाणी जमिनीत पाझरुन या भागात अप्रत्यक्ष सिंचन होईल, अशी ही योजना आहे. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ती सक्षमपणे चाललेली नाही. इतर कालव्यांना ज्या पद्धतीने नियमित आवर्तन सोडले जाते. तसे आवर्तन या चारीला दिले जात नाही. त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड येतात किंवा मध्येच पाण्याची चोरी होते, अशी पाथर्डी तालुक्यातील गावांची तक्रार आहे. योजनेचे लाभार्थी असलेल्या कौडगाव आठरे, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, खांडगाव, जोहारवाडी, मढी, घाटशिरस, तिसगाव, देवराई, त्रिभूवनवाडी, शिरापूर, निंबोडी, करडवाडी, खंडोबाचीवाडी, कान्होबाचीवाडी, वैजूबाभूळगाव या गावांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असून आमच्या भागातील तलाव न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या योजनेसाठी सातत्याने लढा देणारे बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मणियार, अरुण आठरे, संभाजी वाघ, राजेंद्र पाठक, प्रभाकर आठरे, भगवान मरकड, दादासाहेब चोथे, अभिजित शिंदे, सुरेश पवार, रावसाहेब गुंजाळ, विजय कारखेले यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. अगोदर अंतिम टप्प्यातील तलाव भरले जावेत. नंतर योजनेच्या प्रारंभिक टप्यातील तलावांत पाणी सोडावे, अशी या गावांची मागणी आहे. प्रशासन जाणीवपूर्वक याकडे व वरील पाणीचोरीकडे दुर्लक्ष करते, अशीही शेतकºयांची तक्रार आहे.

(क्रमश:)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPathardiपाथर्डीahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय