शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच

By सुधीर लंके | Updated: October 27, 2018 10:46 IST

राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

सुधीर लंकेअहमदनगर: राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. जायकवाडीला पाणी जाते, पण पाथर्डीत पाणी पोहोचत नाही यामुळे पाथर्डी तालुक्यातील ही गावे आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. देशातील हा सर्वात महत्त्वांकाक्षी प्रकल्प यामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे.मुळा धरणातील पाण्याचा राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील ज्या अवर्षणप्रवण भागाला लाभ होत नाही तेथे धरणातून पाईप कालव्याद्वारे (वांबोरी चारी) पाणी देण्याचा निर्णय झाला. माजी खासदार बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात सुरुवातीला १९९०-९१ मध्ये बैठक घेतली होती. या योजनेला १९९९ साली मंजुरी मिळून ती २०११ साली कार्यान्वित झाली.५९ किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे धरणातील पाणी या चार तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ तलावांमध्ये सोडले जाते. तलावातील पाणी जमिनीत पाझरुन या भागात अप्रत्यक्ष सिंचन होईल, अशी ही योजना आहे. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ती सक्षमपणे चाललेली नाही. इतर कालव्यांना ज्या पद्धतीने नियमित आवर्तन सोडले जाते. तसे आवर्तन या चारीला दिले जात नाही. त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड येतात किंवा मध्येच पाण्याची चोरी होते, अशी पाथर्डी तालुक्यातील गावांची तक्रार आहे. योजनेचे लाभार्थी असलेल्या कौडगाव आठरे, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, खांडगाव, जोहारवाडी, मढी, घाटशिरस, तिसगाव, देवराई, त्रिभूवनवाडी, शिरापूर, निंबोडी, करडवाडी, खंडोबाचीवाडी, कान्होबाचीवाडी, वैजूबाभूळगाव या गावांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असून आमच्या भागातील तलाव न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या योजनेसाठी सातत्याने लढा देणारे बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मणियार, अरुण आठरे, संभाजी वाघ, राजेंद्र पाठक, प्रभाकर आठरे, भगवान मरकड, दादासाहेब चोथे, अभिजित शिंदे, सुरेश पवार, रावसाहेब गुंजाळ, विजय कारखेले यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. अगोदर अंतिम टप्प्यातील तलाव भरले जावेत. नंतर योजनेच्या प्रारंभिक टप्यातील तलावांत पाणी सोडावे, अशी या गावांची मागणी आहे. प्रशासन जाणीवपूर्वक याकडे व वरील पाणीचोरीकडे दुर्लक्ष करते, अशीही शेतकºयांची तक्रार आहे.

(क्रमश:)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPathardiपाथर्डीahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय