पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:11+5:302021-07-23T04:14:11+5:30

शेवगाव : मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का, असा संतप्त ...

Will crop insurance be paid after our death? | पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का?

पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का?

शेवगाव : मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का, असा संतप्त सवाल शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयात केला. ही रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी. अन्यथा, प्रांताधिकारी कार्यालयावर पायी दिंडी काढून संताप व्यक्त करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या मागणीचे निवेदन गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांसह जनशक्ती आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना देण्यात आले.

यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राम पोटफोडे, सुरेश चौधरी, किशोर दहिफळे, नवनाथ खेडकर, गोरक्ष चेमटे, शिवाजी लांडे, जगन्नाथ गावडे, आजिनाथ कातकडे, विष्णू दिवटे, देवदान अल्हाट, म्हतारदेव आव्हाड, राजेंद्र खेडकर, अनिल नागरगोजे, दिनकर ढाकणे, विष्णू निजवे, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, सुरेश टेकाळे, भाऊसाहेब मासाळ, हरिश्‍चंद्र आव्हाड, भारत भालेराव, भिवसेन केदार, रघुनाथ घोरपडे, हरिश्चंद्र निजवे आदी उपस्थित होते.

२०२०-२१ या वर्षात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरला होता. मागील वर्षी अतिरिक्त पावसामुळे दोन्ही हंगामातील पिके वाया गेली होती. यामध्ये कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी हंगामातील पिकांचा समावेश आहे. सर्व पिके अतिरिक्त पावसामुळे व वेळेला ताण मिळाल्यामुळे नष्ट झाली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरामधे पेरणीचा खर्चदेखील पडला नाही. लाखोंचा खर्च करूनही काहीच न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

----

शेजारच्या जिल्ह्याला लाभ आपल्याला का नाही?

शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभही मिळालेला आहे. परंतु, या परिसरातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. दहा दिवसांच्या आत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करावी. अन्यथा, दहा दिवसानंतर शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या मागणीच्या पूर्ततेसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अमरापूर ते पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर पायी दिंडी काढून संताप व्यक्त करतील, असे निवेदनात म्हटले आहे.

----

२२ शेवगाव निवेदन

शेवगाव येथे पीक विम्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी स्वीकारले.

220721\1551-img-20210722-wa0018.jpg

खरिप व रब्बी हंगामातील गत वर्षीचा मंजूर झालेला पीक विमा रक्कम तात्काळ खात्यावर वर्ग करावी या मागणीचे निवेदन देतांना जनशक्ती आघाडीचे पदाधिकारी व शेतकरी.

Web Title: Will crop insurance be paid after our death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.