शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:43 IST

लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : "मी १९८५ साली आमदार झाल्यानंतर कधीही दंगल झाली नाही. हिंदू-मुस्लिमांत आपण सतत बंधुभाव टिकवला. पण राजकीय स्वार्थासाठी विरोधकांनी थोरात मुस्लिम धार्जिणे आहेत असा गावोगाव खोटा प्रचार केला. सोशल मीडियावर अपप्रचार केला. निवडणुकीत जातीय व धार्मिक विष पेरले गेले," असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीकेला आहे. आपण मानवता व बंधुभाव सोडणार नाही. या शक्तीविरोधात प्राणपणाने लढू, असंही थोरात म्हणाले. 

विरोधकांवर आरोप करताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, "मतदारसंघात सोशल मीडियावर खोट्या पोस्ट तयार करण्यात आल्या. त्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पोहोचल्या. नवीन तंत्रज्ञानानुसार कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे ठरते.. आपल्याच कॉलेजच्या, आपल्याच घरातील मुलांमध्ये अशा पोस्ट गेल्या. ज्यातून त्यांची माथी भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की ज्यातून त्यांना चीड निर्माण होईल. इतका भडकपणा करण्यात आला. त्यातून बऱ्याच मंडळींचे मन बदलले. माझी राजकारणाची पद्धत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची आहे. मी कुणाचाही द्वेष करत नाही. सर्वांचा आदर करतो. संगमनेर तालुक्यात प्रत्येक समाजाला मानाचे स्थान आहे. प्रत्येक घटकाला येथे संधी दिली. त्यामुळेच बाजारपेठ फुलली. धार्मिक विष पेरणाऱ्यांना हा विकास दिसला नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी कितीही विष पेरले तरी आपण मानवता धर्म सोडणार नाही. लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल," अशा शब्दांत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"नवीन आमदार त्यांचे हत्यार"

"प्रवरा कारखान्याचे गट ऑफिस आता शेडगाव आणि रहिमपूर येथे काढण्यात आले आहे. तेथे नोंदी द्या, म्हणायला लागले. आपल्याकडे गट ऑफिस काढायचे एवढे धाडस कसे व्हायला लागले. याचा अर्थ असा, हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थांवरसुद्धा सुरू झाला आहे. एन्ट्री तिकडून केलेली आहे. त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. आता कारखान्यावर चढाई करून कारखाना संपवून टाकू. त्यांचे हत्यार नवीन झालेला आमदार आहे. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी हे हत्यार वापरले जाणार आहे," अशी टीका थोरात यांनी महसूमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

पराभव नाही घात 

"बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही. मात्र, जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी सुसंस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला," अशी टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातsangamner-acसंगमनेरcongressकाँग्रेस