शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:43 IST

लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : "मी १९८५ साली आमदार झाल्यानंतर कधीही दंगल झाली नाही. हिंदू-मुस्लिमांत आपण सतत बंधुभाव टिकवला. पण राजकीय स्वार्थासाठी विरोधकांनी थोरात मुस्लिम धार्जिणे आहेत असा गावोगाव खोटा प्रचार केला. सोशल मीडियावर अपप्रचार केला. निवडणुकीत जातीय व धार्मिक विष पेरले गेले," असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीकेला आहे. आपण मानवता व बंधुभाव सोडणार नाही. या शक्तीविरोधात प्राणपणाने लढू, असंही थोरात म्हणाले. 

विरोधकांवर आरोप करताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, "मतदारसंघात सोशल मीडियावर खोट्या पोस्ट तयार करण्यात आल्या. त्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पोहोचल्या. नवीन तंत्रज्ञानानुसार कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे ठरते.. आपल्याच कॉलेजच्या, आपल्याच घरातील मुलांमध्ये अशा पोस्ट गेल्या. ज्यातून त्यांची माथी भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की ज्यातून त्यांना चीड निर्माण होईल. इतका भडकपणा करण्यात आला. त्यातून बऱ्याच मंडळींचे मन बदलले. माझी राजकारणाची पद्धत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची आहे. मी कुणाचाही द्वेष करत नाही. सर्वांचा आदर करतो. संगमनेर तालुक्यात प्रत्येक समाजाला मानाचे स्थान आहे. प्रत्येक घटकाला येथे संधी दिली. त्यामुळेच बाजारपेठ फुलली. धार्मिक विष पेरणाऱ्यांना हा विकास दिसला नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी कितीही विष पेरले तरी आपण मानवता धर्म सोडणार नाही. लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल," अशा शब्दांत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"नवीन आमदार त्यांचे हत्यार"

"प्रवरा कारखान्याचे गट ऑफिस आता शेडगाव आणि रहिमपूर येथे काढण्यात आले आहे. तेथे नोंदी द्या, म्हणायला लागले. आपल्याकडे गट ऑफिस काढायचे एवढे धाडस कसे व्हायला लागले. याचा अर्थ असा, हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थांवरसुद्धा सुरू झाला आहे. एन्ट्री तिकडून केलेली आहे. त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. आता कारखान्यावर चढाई करून कारखाना संपवून टाकू. त्यांचे हत्यार नवीन झालेला आमदार आहे. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी हे हत्यार वापरले जाणार आहे," अशी टीका थोरात यांनी महसूमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

पराभव नाही घात 

"बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही. मात्र, जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी सुसंस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला," अशी टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातsangamner-acसंगमनेरcongressकाँग्रेस