शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

केडगावमधील दगडफेक आम्ही केलीच नाही - अनिल राठोड यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 10:19 IST

शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या लेखानंतर कार्यालयास भेट देऊन केली भूमिका स्पष्टसहायक अधीक्षक अक्षय शिंदे आणि कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्यामुळेच हत्याकांडफॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी उशिरा पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल ६०० शिवसैनिकांची पूर्ण नावे पोलिसांनी सांगावितमृतदेहांना पोलिसांनीच कोणाला हात लावू दिला नाहीकेडगावमध्ये अजूनही घबराट

अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला व केडगाव येथे झालेली दगडफेक याची तुलनाच होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.केडगाव दगडफेकीनंतर पोलिसांनी शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने शनिवारी ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळे राठोड यांनी शनिवारी स्वत:हून ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपली भूमिका विशद केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे उपस्थित होते. राठोड म्हणाले की, शिवसैनिक हे अटकेला भीत नाहीत. आम्ही केव्हाही अटक व्हायला तयार आहोत. मात्र पोलिसांनी राजकीय दबावापोटी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.केडगावमध्ये शिवसैनिकांचे हत्याकांड झाले, त्यावेळी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात केडगावमधील दहशतीबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी आम्हाला केडगाव येथे शिवसैनिकांवर गोळीबार झाल्याचे समजले. आम्ही केडगावला जाण्यापूर्वीच मारेकरी तेथे दगडफेक करून पळाले होते. त्यानंतर हत्याकांड पाहून मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. त्यात शिवसैनिकांचा सहभाग नव्हता. पोलीस अधिकाºयांची जी वाहने अडविण्यात आली ती स्थानिक जनतेने पोलिसांविरोधात असलेल्या रोषातून अडविली. केडगावमध्ये निवडणुकीत प्रचंड दहशत असतानाही पोलिसांनी काहीच दखल घेतली नव्हती. त्या रागातून वाहने अडविली गेली. यातही शिवसैनिकांचा काहीच सहभाग नव्हता. मृतदेहांना पोलिसांनीच कोणाला हात लावू दिला नाही. फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी उशिरा आल्याने मृतदेह जागेवर ठेवण्यात आले. त्यामुळे शिवसैनिकांनी मृतदेहाची विटंबना केली, या आरोपात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ६०० शिवसैनिकांची पूर्ण नावे जर पोलीस सांगू शकले, तर आपण केव्हाही अटक व्हायला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले. शिवसैनिकांच्या मारेक-यांना अटक होऊन त्यांना शिक्षा व्हायला हवी. तरच त्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर हिंसाचार होतो, तेव्हा पोलीस सदोष मनुष्यवधाचेच गुन्हे दाखल करतात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्यामुळेच हत्याकांडकेडगाव पोटनिवडणुकीत आमचे बूथ ताब्यात घेतले गेले. आमच्या कार्यकर्त्यांना पळवून लावले. आम्ही सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांना याबाबत कळवले. परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही. अन्यथा हत्याकांडाची घटनाच घडली नसती. याला सर्वस्वी हे दोन अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप दिलीप सातपुते यांनी केला.आरोपी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसोबतकेडगाव हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीच्या नूतन प्रदेशाध्यक्षांसोबत फिरत आहेत. मग ते पोलिसांना कसे सापडत नाहीत, असा सवाल करत केडगावमध्ये अजूनही घबराट आहे. लोक दहशतीखाली आहेत, असे योगिराज गाडे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv SenaशिवसेनाAnil Rathodअनिल राठोडNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसRam Shindeराम शिंदे