शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Video : गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, जलमार्गातून विद्यार्थ्यांचेही होतायंत हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:39 IST

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत.

अनिल साठे 

शेवगाव (जि. अहमदनगर) : आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागातून, नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल.! मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही, शेवगाव तालुक्यातील आपेगावंकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. गावातून वाहणाऱ्या ढोरा नदी पात्रामुळे गाव विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. ही जल प्रवासाची अत्यंत धोकादायक वेळ, आपेगाव येथील लहानमुलांसह वृद्ध आणि महिलांवर आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका झाल्याचे, तसेच दोघा जणांचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात.

या गावातील अण्णासाहेब बोरुडे यांनी सांगितले, की छाती इतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणं जाणं करावं लागतंय. आमच्या लेकरांना शाळेत पाठवतांना काळजावर दगड ठेऊन पाठवावे लागते आहे, मात्र आमची दया कोणालाही येईना झाली. राहुल शेळके म्हणाले आजवर पाय घसरुन दोघांचा जीव गेला, मात्र कोणालाही दया आली नाही. अद्यापही आम्ही पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी सोबत भांडतो आहोत मात्र आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही. अन्य मार्गाने जायचे म्हटले तर सहा किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो आहे. 

ग्रामस्थ म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडणूक आली कि येतात आणि भाऊ, दादा, काका, ताई आम्हाला मतदान करा, आम्ही पूल देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला पूल द्यावा हीच आमची मागणी आहे. रस्ता नसल्यामुले येथील शाळकरी दादा शेळके म्हणाला, की मात्र माझे पप्पा आजरी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. शाळेत जायचे म्हटले की पालकांना कामधंदा सोडून सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जातांना भीती वाटते, कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळा देखील बुडते अशी खंत 'दादा' या चिमुकल्याने व्यक्त केली.

लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके, आदी ग्रामस्थांनी पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणूक दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी