शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Video : गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, जलमार्गातून विद्यार्थ्यांचेही होतायंत हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:39 IST

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत.

अनिल साठे 

शेवगाव (जि. अहमदनगर) : आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागातून, नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल.! मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही, शेवगाव तालुक्यातील आपेगावंकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. गावातून वाहणाऱ्या ढोरा नदी पात्रामुळे गाव विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. ही जल प्रवासाची अत्यंत धोकादायक वेळ, आपेगाव येथील लहानमुलांसह वृद्ध आणि महिलांवर आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका झाल्याचे, तसेच दोघा जणांचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात.

या गावातील अण्णासाहेब बोरुडे यांनी सांगितले, की छाती इतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणं जाणं करावं लागतंय. आमच्या लेकरांना शाळेत पाठवतांना काळजावर दगड ठेऊन पाठवावे लागते आहे, मात्र आमची दया कोणालाही येईना झाली. राहुल शेळके म्हणाले आजवर पाय घसरुन दोघांचा जीव गेला, मात्र कोणालाही दया आली नाही. अद्यापही आम्ही पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी सोबत भांडतो आहोत मात्र आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही. अन्य मार्गाने जायचे म्हटले तर सहा किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो आहे. 

ग्रामस्थ म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडणूक आली कि येतात आणि भाऊ, दादा, काका, ताई आम्हाला मतदान करा, आम्ही पूल देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला पूल द्यावा हीच आमची मागणी आहे. रस्ता नसल्यामुले येथील शाळकरी दादा शेळके म्हणाला, की मात्र माझे पप्पा आजरी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. शाळेत जायचे म्हटले की पालकांना कामधंदा सोडून सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जातांना भीती वाटते, कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळा देखील बुडते अशी खंत 'दादा' या चिमुकल्याने व्यक्त केली.

लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके, आदी ग्रामस्थांनी पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणूक दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी