शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Video : गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, जलमार्गातून विद्यार्थ्यांचेही होतायंत हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:39 IST

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत.

अनिल साठे 

शेवगाव (जि. अहमदनगर) : आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागातून, नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल.! मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही, शेवगाव तालुक्यातील आपेगावंकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.

तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी २०० ते २५० घरे असून २ हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या तर सुमारे ७५० मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. गावातून वाहणाऱ्या ढोरा नदी पात्रामुळे गाव विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. ही जल प्रवासाची अत्यंत धोकादायक वेळ, आपेगाव येथील लहानमुलांसह वृद्ध आणि महिलांवर आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका झाल्याचे, तसेच दोघा जणांचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात.

या गावातील अण्णासाहेब बोरुडे यांनी सांगितले, की छाती इतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणं जाणं करावं लागतंय. आमच्या लेकरांना शाळेत पाठवतांना काळजावर दगड ठेऊन पाठवावे लागते आहे, मात्र आमची दया कोणालाही येईना झाली. राहुल शेळके म्हणाले आजवर पाय घसरुन दोघांचा जीव गेला, मात्र कोणालाही दया आली नाही. अद्यापही आम्ही पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी सोबत भांडतो आहोत मात्र आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही. अन्य मार्गाने जायचे म्हटले तर सहा किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो आहे. 

ग्रामस्थ म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडणूक आली कि येतात आणि भाऊ, दादा, काका, ताई आम्हाला मतदान करा, आम्ही पूल देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला पूल द्यावा हीच आमची मागणी आहे. रस्ता नसल्यामुले येथील शाळकरी दादा शेळके म्हणाला, की मात्र माझे पप्पा आजरी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. शाळेत जायचे म्हटले की पालकांना कामधंदा सोडून सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जातांना भीती वाटते, कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळा देखील बुडते अशी खंत 'दादा' या चिमुकल्याने व्यक्त केली.

लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके, आदी ग्रामस्थांनी पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणूक दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी