शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

आदिवासी भागात मसाले पिके घेण्यास झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

अकोले : ''''विकेल ते पिकेल'''' या तत्त्वावर आदिवासी भागात प्रथमच काळीमिरी, जायफळ, दालचिनी, चारोळीसारखे मसाले पिके तसेच सफेद मुसळी, ...

अकोले : ''''विकेल ते पिकेल'''' या तत्त्वावर आदिवासी भागात प्रथमच काळीमिरी, जायफळ, दालचिनी, चारोळीसारखे मसाले पिके तसेच सफेद मुसळी, जांभळा भात, दिवाळी तूर, खपल्या गहू अशी पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. मार्केट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्यास शेती निश्चित किफायतशीर होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हरिश्चंद्रगडाच्या कुशीत तयार होत असलेल्या मसाले पिकाचा ब्रँड राज्यभर लौकिकला जावा, यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे व तालुका कृषी विभाग प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धामणवन-शिरपुंजे भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या निळ्या-जांभळ्या सेंद्रिय भाताची मेहेंदुरी येथील अगस्ती कृषी प्रोड्युसर कंपनीच्यावतीने विक्री व्यवस्था करण्यात आली. कोरोनासंकट काळात तालुक्यातील धामणवन येथील मसाले पीक शेती बहरात अाली. आत्मा अंतर्गत हनुमान शेतकरी गटाने शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. २० शेतकऱ्यांनी प्रायोगिक मसाला पीक शेती सुरू केली आहे. तीन वर्षे काळीमिरी उत्पादन सुरू होण्यास लागतात; पण सुनील बारामते यांच्या शेतात एक वर्षांत काळीमिरी फळ लगडले आहे. कोकम, चारोळी, जायफळ, फणस, जांभळा भात, सेंद्रिय चारसूत्री भात, ठिबक भुईमूग, सफेद मुसळी, मत्स्य व मधमाशी पालन अशी बहूअंगी शेती धामणवन येथे शेतकरी गटाने फुलवली आहे. १० शेतकऱ्यांनी सेंद्रिय निळा जांभळा भात पीक घेतले आहे. तालुक्यातील आदिवासी भागात प्रायोगिक तत्त्वावर बारामती येथून आणलेली २७० फणस कलम व आक्रनी-धडगाव नंदुरबार या आदिवासी भागातून ११० चारोळी रोपे आणून शेतकऱ्यांच्या बांधावर लावण्यात आली आहेत.चारोळीचे उत्पादन पाच वर्षांनी सुरू होते. एका झाडापासून २३ किलो चारोळी मिळते. किलोला २ हजार भाव सध्या मिळत असून, एक झाड वर्षाला किमान ४५ हजार रुपये मिळवून देते. ३० शेतकऱ्यांनी रब्बीसाठी प्रथमच उन्हाळी नाचणी रोपवाटिका तयार केल्या आहेत. तर २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक घेण्यासाठी रोप टाकले आहे.

दूधमोगरा -

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात डोंगर उतार आणि डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या निचऱ्याची जमिनींवर भात खाचरांची जागा सोडून वरई हे खरिपातील महत्त्वाचे पीक घेतले जाते. दूधमोगरा या वरईच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाने अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना भुरळ पाडली आहे. लोंबीची लांबी सुमारे तीस ते पस्तीस सेंटिमीटर एवढी लांब आहे. या वाणाचे हेक्टरी २५ ते २७ क्विंटल उत्पन्न मिळते. जवळपास हे इतर वाणाच्या तुलनेत दुप्पट आहे. चालू हंगामात तालुक्यात सुमारे ७५ एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे भारत सरकारच्या राष्ट्रीय वनस्पती जनुकिय संस्थान नवी दिल्ली येथे या वाणाची नोंदणी करण्यात आलेली आहे.