शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आदिवासी भागात मसाले पिके घेण्यास झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

अकोले : ''''विकेल ते पिकेल'''' या तत्त्वावर आदिवासी भागात प्रथमच काळीमिरी, जायफळ, दालचिनी, चारोळीसारखे मसाले पिके तसेच सफेद मुसळी, ...

अकोले : ''''विकेल ते पिकेल'''' या तत्त्वावर आदिवासी भागात प्रथमच काळीमिरी, जायफळ, दालचिनी, चारोळीसारखे मसाले पिके तसेच सफेद मुसळी, जांभळा भात, दिवाळी तूर, खपल्या गहू अशी पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. मार्केट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्यास शेती निश्चित किफायतशीर होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हरिश्चंद्रगडाच्या कुशीत तयार होत असलेल्या मसाले पिकाचा ब्रँड राज्यभर लौकिकला जावा, यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे व तालुका कृषी विभाग प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धामणवन-शिरपुंजे भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या निळ्या-जांभळ्या सेंद्रिय भाताची मेहेंदुरी येथील अगस्ती कृषी प्रोड्युसर कंपनीच्यावतीने विक्री व्यवस्था करण्यात आली. कोरोनासंकट काळात तालुक्यातील धामणवन येथील मसाले पीक शेती बहरात अाली. आत्मा अंतर्गत हनुमान शेतकरी गटाने शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. २० शेतकऱ्यांनी प्रायोगिक मसाला पीक शेती सुरू केली आहे. तीन वर्षे काळीमिरी उत्पादन सुरू होण्यास लागतात; पण सुनील बारामते यांच्या शेतात एक वर्षांत काळीमिरी फळ लगडले आहे. कोकम, चारोळी, जायफळ, फणस, जांभळा भात, सेंद्रिय चारसूत्री भात, ठिबक भुईमूग, सफेद मुसळी, मत्स्य व मधमाशी पालन अशी बहूअंगी शेती धामणवन येथे शेतकरी गटाने फुलवली आहे. १० शेतकऱ्यांनी सेंद्रिय निळा जांभळा भात पीक घेतले आहे. तालुक्यातील आदिवासी भागात प्रायोगिक तत्त्वावर बारामती येथून आणलेली २७० फणस कलम व आक्रनी-धडगाव नंदुरबार या आदिवासी भागातून ११० चारोळी रोपे आणून शेतकऱ्यांच्या बांधावर लावण्यात आली आहेत.चारोळीचे उत्पादन पाच वर्षांनी सुरू होते. एका झाडापासून २३ किलो चारोळी मिळते. किलोला २ हजार भाव सध्या मिळत असून, एक झाड वर्षाला किमान ४५ हजार रुपये मिळवून देते. ३० शेतकऱ्यांनी रब्बीसाठी प्रथमच उन्हाळी नाचणी रोपवाटिका तयार केल्या आहेत. तर २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक घेण्यासाठी रोप टाकले आहे.

दूधमोगरा -

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात डोंगर उतार आणि डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या निचऱ्याची जमिनींवर भात खाचरांची जागा सोडून वरई हे खरिपातील महत्त्वाचे पीक घेतले जाते. दूधमोगरा या वरईच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाने अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना भुरळ पाडली आहे. लोंबीची लांबी सुमारे तीस ते पस्तीस सेंटिमीटर एवढी लांब आहे. या वाणाचे हेक्टरी २५ ते २७ क्विंटल उत्पन्न मिळते. जवळपास हे इतर वाणाच्या तुलनेत दुप्पट आहे. चालू हंगामात तालुक्यात सुमारे ७५ एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे भारत सरकारच्या राष्ट्रीय वनस्पती जनुकिय संस्थान नवी दिल्ली येथे या वाणाची नोंदणी करण्यात आलेली आहे.