शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:33 IST

आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.

BJP Sujay Vikhe: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच आता महायुतीतील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनीही बीडचं नाव घेत आपल्या स्थानिक विरोधकांना टोला लगावला आहे. "विधानसभेची निवडणूक महत्त्वाची होती. आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते. तीन महिन्यांत मस्साजोगसारखी घटना घडली असती. मतदारांनी अहिल्यानगरला बीड होण्यापासून वाचवले," असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे आमदार शिवाजी कर्डिले, काशीनाथ दाते, संग्राम जगताप यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. तसेच 'खेळ पैठणी'चा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुजय विखे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

सुजय विखे पुढे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत मला जरी नाकारले असले तरी अहिल्यानगर तालुक्याला पाणी द्यायच्या जबाबदारीचे खाते हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मिळाले आहे. पुढील निवडणुकीत पाणी देणाऱ्यालाच मतदान केले पाहिजे अशी प्रत्येकाने भूमिका ठेवली पाहिजे. कर्डिले, दाते, पाचपुते यांच्या सहकार्याने शब्द देतो की, अडीच वर्षांच्या काळात साकळाई पाणी अकोळनेर गावात आणल्याशिवाय परत येणार नाही," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेAhilyanagarअहिल्यानगरBJPभाजपा