शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

स्तुत्य उपक्रम... जिल्ह्यातील १००७ जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:30 IST

अहमदनगर - राज्यात सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०२०मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा ...

अहमदनगर- राज्यात सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०२०मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातीवाचक नावे दिल्याचे दिसून येते. अशी जातीवाचक नावे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत, ही बाब विचारात घेऊन सरकारने ही नावे बदलण्याचा निर्णय घेतला. त्या वस्त्यांना आता समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, क्रांतीनगर अशा विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे देण्याचे शासनाच्या विचाराधिन आहे.

शासनाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात कोणत्या वस्त्यांना अशी जातीवाचक नावे आहेत, ही माहिती घेण्यात आली. त्यानुसार ही नावे बदलण्याबाबत संबंधित वस्तीवरील ग्रामस्थ, गावचे पदाधिकारी यांनी चर्चा करून ग्रामसभेतही त्यावर मते मागवली गेली. ज्या वस्त्यांची नावे बदलायची आहेत, अशा १००७ वस्त्या असल्याचे समोर आले. त्यानुसार तसा ठराव ग्रामसभेत करून तो पंचायत समिती व तेथून जिल्हा परिषदेकडे मागविण्यात आला. आतापर्यंत १००७पैकी ६५४ ठराव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ठरावही येत्या महिनाभरात प्राप्त करून हे सर्व ठराव जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्त व तेथून शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

शासनाच्या निर्णयानुसार जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याबाबत आदेश आहेत. जिल्ह्यात अशा एकूण १००७ वस्त्या आहेत. त्यांची नावे बदलण्याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव घ्यायचे आहेत. आतापर्यंत ६५४ ठराव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ठरावही येत्या महिनाभरात प्राप्त होतील. नंतर ते एकत्रित शासनाकडे पाठवले जातील.

- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

शासनाने आधी वस्त्यांचे सर्वेक्षण करून लोकसंख्या निश्चित करावी. त्यानंतर जातीवाचक वस्तीचे नाव बदलून सर्वसमावेशक नाव द्यावे. ज्या नावावरून धार्मिक किंवा जातीय तेढ, गावात वाद-विवाद पुन्हा निर्माण होणार नाही. शासनाचा नाव बदलण्याचा उद्देश सफल झाला पाहिजे.

- आबासाहेब सोनवणे, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषदPoliceपोलिस