शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 23:07 IST

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

मुंबई/अहमदनगर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शनही घेतले. त्यानंतर, प्रवरानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवत राजनाथसिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन विरोधकांना टोला लगावला. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना केवळ नाव इंडिया ठेवलं म्हणून कोणी मोठं होतं नाही. तर, कर्तृत्व मोठं असायला हवं, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. नाव मोठे, लक्षण खोटे असं मराठीत म्हणत सिंह यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख आय.एन.डी.आय.ए आघाडी असा केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात भारताची मान उंचावल्याचही ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना आपल्या भारतातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. त्यांचे पालक मोदींकडे आले आणि त्यांनी मुलांना भारतात परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर, मोदींनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना फोन करुन ४ तास युद्ध थांबवलं होतं. त्यानंतर, भारताचे सर्व विद्यार्थी मायदेशी परतले, असा किस्साही राजनाथसिंह यांनी सांगितला. 

दरम्यान, येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच, इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. 

आगीशी खेळू नका - CM शिंदे

हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई