शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 23:07 IST

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

मुंबई/अहमदनगर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शनही घेतले. त्यानंतर, प्रवरानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवत राजनाथसिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन विरोधकांना टोला लगावला. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना केवळ नाव इंडिया ठेवलं म्हणून कोणी मोठं होतं नाही. तर, कर्तृत्व मोठं असायला हवं, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. नाव मोठे, लक्षण खोटे असं मराठीत म्हणत सिंह यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख आय.एन.डी.आय.ए आघाडी असा केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात भारताची मान उंचावल्याचही ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना आपल्या भारतातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. त्यांचे पालक मोदींकडे आले आणि त्यांनी मुलांना भारतात परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर, मोदींनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना फोन करुन ४ तास युद्ध थांबवलं होतं. त्यानंतर, भारताचे सर्व विद्यार्थी मायदेशी परतले, असा किस्साही राजनाथसिंह यांनी सांगितला. 

दरम्यान, येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच, इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. 

आगीशी खेळू नका - CM शिंदे

हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई