शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 23:07 IST

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

मुंबई/अहमदनगर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शनही घेतले. त्यानंतर, प्रवरानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवत राजनाथसिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन विरोधकांना टोला लगावला. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना केवळ नाव इंडिया ठेवलं म्हणून कोणी मोठं होतं नाही. तर, कर्तृत्व मोठं असायला हवं, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. नाव मोठे, लक्षण खोटे असं मराठीत म्हणत सिंह यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख आय.एन.डी.आय.ए आघाडी असा केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात भारताची मान उंचावल्याचही ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना आपल्या भारतातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. त्यांचे पालक मोदींकडे आले आणि त्यांनी मुलांना भारतात परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर, मोदींनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना फोन करुन ४ तास युद्ध थांबवलं होतं. त्यानंतर, भारताचे सर्व विद्यार्थी मायदेशी परतले, असा किस्साही राजनाथसिंह यांनी सांगितला. 

दरम्यान, येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच, इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. 

आगीशी खेळू नका - CM शिंदे

हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई