शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 23:07 IST

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

मुंबई/अहमदनगर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शनही घेतले. त्यानंतर, प्रवरानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवत राजनाथसिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन विरोधकांना टोला लगावला. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना केवळ नाव इंडिया ठेवलं म्हणून कोणी मोठं होतं नाही. तर, कर्तृत्व मोठं असायला हवं, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. नाव मोठे, लक्षण खोटे असं मराठीत म्हणत सिंह यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख आय.एन.डी.आय.ए आघाडी असा केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात भारताची मान उंचावल्याचही ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असताना आपल्या भारतातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. त्यांचे पालक मोदींकडे आले आणि त्यांनी मुलांना भारतात परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर, मोदींनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना फोन करुन ४ तास युद्ध थांबवलं होतं. त्यानंतर, भारताचे सर्व विद्यार्थी मायदेशी परतले, असा किस्साही राजनाथसिंह यांनी सांगितला. 

दरम्यान, येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच, इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. 

आगीशी खेळू नका - CM शिंदे

हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई