शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

जिल्ह्यात आता १४ दिवसांसाठी कडक ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना ...

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता नाही. येथून पुढे १४ दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल. अर्थात तो जनता कर्फ्यू असेल. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सुधारित आदेश काढतील, असेही पालकमंत्र्यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तोकडी आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, त्यामुळे रुग्णांचे सुरू असलेले हाल, प्रशासकीय यंत्रणेचा गाफीलपणा आदींबाबत पत्रकारांनी मुश्रीफ यांना धारेवर धरले. त्यानंतर मुश्रीफ यांनी सध्या सुरू असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनीच सहकार्य करायचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळायची आहे. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तीव्रता कमी होण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात एकमेकांचा संपर्क कमी झाला तर रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने सर्व तयारी केली होती. आजही ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर शिल्लक आहेत. मात्र, निर्मिती क्षमतेला मर्यादा असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. याबाबत जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याबाबत राज्यस्तरावर नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

------

असा वाढला कोरोना..............

१० दिवसांतील रुग्ण- २३६४१

फेब्रुवारी-२०२१-३६४५

मार्च-२०२१-१९०४१

एप्रिल-२०२१-३४३३५

आतापर्यंतच्या चाचण्या-५,७६,८१९

पाॅझिटिव्ह होण्याचे प्रमाण-२२ टक्के

बरे होण्याचे प्रमाण-२२.४१ टक्के

-------

असे झाले मृत्यू...............

फेब्रुवारी-२०२१- ४८

मार्च-२०२१-१२२

एप्रिल-२०२१-१७०

एकूण मृत्यू-१४४१

मृत्यू होण्याचे प्रमाण-१.११ टक्के

-----------

गावांनी खबरदारी घ्यावी

आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाला अडविण्याचे ठरविले तर गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही. गावात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करून त्याला १० दिवस प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवणे गरजेचे आहे. ही खबरदारी गावपातळीवर घेतली तर कोरोना लवकरच संपुष्टात येईल. कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी ग्रामसमिती आणि प्रभाग समितीने घेतली तर त्यांचे कामही सिद्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

-------------

अपूर्ण