शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता १४ दिवसांसाठी कडक ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना ...

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता नाही. येथून पुढे १४ दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल. अर्थात तो जनता कर्फ्यू असेल. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सुधारित आदेश काढतील, असेही पालकमंत्र्यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तोकडी आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, त्यामुळे रुग्णांचे सुरू असलेले हाल, प्रशासकीय यंत्रणेचा गाफीलपणा आदींबाबत पत्रकारांनी मुश्रीफ यांना धारेवर धरले. त्यानंतर मुश्रीफ यांनी सध्या सुरू असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनीच सहकार्य करायचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळायची आहे. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तीव्रता कमी होण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात एकमेकांचा संपर्क कमी झाला तर रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने सर्व तयारी केली होती. आजही ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर शिल्लक आहेत. मात्र, निर्मिती क्षमतेला मर्यादा असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. याबाबत जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याबाबत राज्यस्तरावर नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

------

असा वाढला कोरोना..............

१० दिवसांतील रुग्ण- २३६४१

फेब्रुवारी-२०२१-३६४५

मार्च-२०२१-१९०४१

एप्रिल-२०२१-३४३३५

आतापर्यंतच्या चाचण्या-५,७६,८१९

पाॅझिटिव्ह होण्याचे प्रमाण-२२ टक्के

बरे होण्याचे प्रमाण-२२.४१ टक्के

-------

असे झाले मृत्यू...............

फेब्रुवारी-२०२१- ४८

मार्च-२०२१-१२२

एप्रिल-२०२१-१७०

एकूण मृत्यू-१४४१

मृत्यू होण्याचे प्रमाण-१.११ टक्के

-----------

गावांनी खबरदारी घ्यावी

आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाला अडविण्याचे ठरविले तर गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही. गावात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करून त्याला १० दिवस प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवणे गरजेचे आहे. ही खबरदारी गावपातळीवर घेतली तर कोरोना लवकरच संपुष्टात येईल. कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी ग्रामसमिती आणि प्रभाग समितीने घेतली तर त्यांचे कामही सिद्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

-------------

अपूर्ण