शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:08 IST

सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

योगेश गुंडकेडगाव : सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.सुमारे ८० हजारापेक्षा जास्त लोकवस्ती असणा?्या केडगाव मधून महापालिकेला वषार्ला सुमारे ४ कोटी रुपयांचा कर रूपाने महसूल मिळतो.रखडलेल्या मुलभूत सुविधा योजनेतील कामांशिवाय गेल्या चार-पाच वर्षात केडगाव भागात कोणतेच नाव घेण्याजोगे काम उभे राहू शकले नाही.केडगाव मधील विविध वसाहतीमधील पथदिव्यांची संख्या जवळपास ३ हजारांच्या घरात आहे,मात्र यातील २ हजार दिवे हि सुरु नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत..गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले दिवे सुरु करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने अनेक ठिकाणी अंधारातच नागरिक चाचपडत आहेत.आता पावसाळा सुरु होणार असल्याने अंधारात रस्त्यावरील डबके,खड्डे यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.नगर-पुणे राज्यमार्गावर केडगाव पर्यंत रस्ता दुभाजकावर दिव्यांचे खांब लावण्यात आले.मोठ्या थाटामाटात त्याचे उद्घाटन करण्यात आले.मात्र एक-एक करत निम्मे दिवे बंद पडले तरी ते पुन्हा सुरु करण्याकडे महापालिकने लक्ष दिले नाही.रात्रीच्या वेळी राज्यमार्गावर अंधार होत असल्याने अनेक अपघात घडत आहेत.रेल्वे उड्डाणपूल तर नेहमीच अंधारात असतो.अनेक खांबाना वाहनांनी धडक दिल्याने ते रस्तावर वाकडे पडले अआहेत.नागरिकांनाच ते सरळ करावे लागत आहेत.साहित्यच नाही आम्ही तरी काय करूकेडगाव मधील बंद पथदिव्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना .आम्ही अनेकदा मनपाकडे साहित्य मागतो,पण साहित्यच मिळत नाही मग आम्ही दिवे तरी कसे सुरु करणार, असे उत्तर कर्मचार्यांकडून ऐकावे लागते. मनपाकडे साहित्य नसल्याने केडगाव मधील नागरिक अंधारात चाचपडत आहेत.हे साहित्य कधी येईल आणि कधी केडगावचा अंधार दूर होईल असा प्रश्न नागरिक करत आहेत.‘भाग्योदय’चे खासगीकरण व्हावेवषार्ला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणारे केडगाव मधील भाग्योदय मंगल कार्यालय मनपाला केडगाव ग्रामपंचायतीकडून आयते मिळाले.मात्र त्याचे नूतनीकरण तर सोडाच पण साधी डागडुजी करण्याची तसदी हि मनपाने कधीच घेतली नाही.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाने सुस्थितीत असणारे हे कार्यालय अडगळीत पडले आहे.त्याचे खासगीकरण व्हावे तरच या कार्यालयाचे खरे ह्यभाग्य ह्य उजळेल अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका