शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:08 IST

सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

योगेश गुंडकेडगाव : सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.सुमारे ८० हजारापेक्षा जास्त लोकवस्ती असणा?्या केडगाव मधून महापालिकेला वषार्ला सुमारे ४ कोटी रुपयांचा कर रूपाने महसूल मिळतो.रखडलेल्या मुलभूत सुविधा योजनेतील कामांशिवाय गेल्या चार-पाच वर्षात केडगाव भागात कोणतेच नाव घेण्याजोगे काम उभे राहू शकले नाही.केडगाव मधील विविध वसाहतीमधील पथदिव्यांची संख्या जवळपास ३ हजारांच्या घरात आहे,मात्र यातील २ हजार दिवे हि सुरु नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत..गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले दिवे सुरु करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने अनेक ठिकाणी अंधारातच नागरिक चाचपडत आहेत.आता पावसाळा सुरु होणार असल्याने अंधारात रस्त्यावरील डबके,खड्डे यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.नगर-पुणे राज्यमार्गावर केडगाव पर्यंत रस्ता दुभाजकावर दिव्यांचे खांब लावण्यात आले.मोठ्या थाटामाटात त्याचे उद्घाटन करण्यात आले.मात्र एक-एक करत निम्मे दिवे बंद पडले तरी ते पुन्हा सुरु करण्याकडे महापालिकने लक्ष दिले नाही.रात्रीच्या वेळी राज्यमार्गावर अंधार होत असल्याने अनेक अपघात घडत आहेत.रेल्वे उड्डाणपूल तर नेहमीच अंधारात असतो.अनेक खांबाना वाहनांनी धडक दिल्याने ते रस्तावर वाकडे पडले अआहेत.नागरिकांनाच ते सरळ करावे लागत आहेत.साहित्यच नाही आम्ही तरी काय करूकेडगाव मधील बंद पथदिव्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना .आम्ही अनेकदा मनपाकडे साहित्य मागतो,पण साहित्यच मिळत नाही मग आम्ही दिवे तरी कसे सुरु करणार, असे उत्तर कर्मचार्यांकडून ऐकावे लागते. मनपाकडे साहित्य नसल्याने केडगाव मधील नागरिक अंधारात चाचपडत आहेत.हे साहित्य कधी येईल आणि कधी केडगावचा अंधार दूर होईल असा प्रश्न नागरिक करत आहेत.‘भाग्योदय’चे खासगीकरण व्हावेवषार्ला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणारे केडगाव मधील भाग्योदय मंगल कार्यालय मनपाला केडगाव ग्रामपंचायतीकडून आयते मिळाले.मात्र त्याचे नूतनीकरण तर सोडाच पण साधी डागडुजी करण्याची तसदी हि मनपाने कधीच घेतली नाही.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाने सुस्थितीत असणारे हे कार्यालय अडगळीत पडले आहे.त्याचे खासगीकरण व्हावे तरच या कार्यालयाचे खरे ह्यभाग्य ह्य उजळेल अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका