शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:38 IST

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.

राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणा-या पाण्याच्या आवर्तनांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत लाभ क्षेत्रात पाऊस पडल्याने पाण्याची मागणी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही धरणांत पाणीसाठा जवळपास जैसे थे आहे. सध्या भंडारदरा धरणात १० हजार ८०३ दशलक्ष घनफूट तर निळवंडे मध्ये ७ हजार ९१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही धरणांमध्ये एकूण १८ हजार ७२१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी साठी एका आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. हे आवर्तन बुधवारी सोडण्याचे नियोजित होते. मात्र निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट कार्यान्वित झाले नाही. यांत्रिकी विभागामार्फत हे गेट दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. दोन दिवसांत हे गेट सुरळीत होईल आणि निळवंडे धरणातून रविवारी किंवा सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात होईल, असे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश हारदे यांनी सांगितले.  या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेने कमी आहे. या आवर्तनात सुमारे अडीच ते तीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता असून हे आवर्तन २५ दिवस चालण्याचा अंदाज सहायक अभियंता हारदे यांनी व्यक्त केला. रब्बीच्या आवर्तनानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याचे पहिले आवर्तन सुटणार असून त्यानंतर दोन असे उन्हाळ्यासाठी एकूण तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरwater shortageपाणीकपातFarmerशेतकरीDamधरण