शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:11 IST

गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे.

कोपरगाव - तालुक्यातील पूर्व भागातील गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे. हेच पाणी सोमैया उद्योग समूहाच्या गोदावरी बायोरिफायनरीज रासायनिक प्रकल्प हा अनेक इलेक्ट्रिक मोटारीच्या सहायाने रात्रंदिवस बेसुमार पाणी उपसा करत उद्योगासाठी वापरत असल्याने कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (8 नोव्हेंबर) रोजी सकाळी वारी, कान्हेगाव व सडे येथील शेकडो शेतकऱ्यांनी सर्व मोटारी बंद पाडत,पाईपलाईन फोडून टाकल्या.

माजी सभापती मच्छिंद्र टेके बोलताना म्हणाले, यंदा तालुक्यात दुष्काळ पडला आहे, जमिनी नापेर राहिल्या आहे अशा वेळी दुर्दैवाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. गोदावरी पात्रातून ते पाणी वाहिले ते आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. म्हणून आम्ही व आमच्या शेतकऱ्यांनी शासनाला विनंती करून तालुक्यातील गोदावरी नदीवरील सर्वच बंधाऱ्यात दोन फळ्या पाणी राहूद्या जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल परंतु याच गोदावरी नदीवरील शिंगवे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मात्र गोदावरी बयोरीफायनरीज हा कारखाना रात्रंदिवस २४ तास सोळा मोटारी लाऊन पाणी उपसतो आहे व उद्योगासाठी वापरात आहे. या संदर्भात आम्ही शासनाला कळवले,स्थानिक कारखाना व्यवस्थापनाला विनंती केली,वारी,कान्हेगाव, सडे या ग्रामपंचायतीनी पत्रव्यवहार केला. तरीही स्थानिक व्यवस्थापनाने दाद दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतापून पाणी उपसा करणारी यंत्रणा उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.जर व्यवस्थापने ही यंत्रणा तत्काळ उचलत पाणी उपसा बंद केला नाही तर शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन पुढील कारवाई करावी लागेल.अशी वेळ या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने जाणूनबुजून आणली असल्याचे मच्छिंद्र टेके शेवटी म्हणाले.          कारखाना व्यवस्थापणाचा ग्रामस्थांशी समन्वयाचा अभाव

गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक एस मोहन यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी पदभार स्वीकारला तेव्हा पासून स्थानिक ग्रामस्थ, कामगार, शेतकरी यांच्याशी यांचे कायमच खटके उडत आहे. परंतु आता मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने व्यवस्थापन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरriverनदी