शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:11 IST

गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे.

कोपरगाव - तालुक्यातील पूर्व भागातील गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे. हेच पाणी सोमैया उद्योग समूहाच्या गोदावरी बायोरिफायनरीज रासायनिक प्रकल्प हा अनेक इलेक्ट्रिक मोटारीच्या सहायाने रात्रंदिवस बेसुमार पाणी उपसा करत उद्योगासाठी वापरत असल्याने कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (8 नोव्हेंबर) रोजी सकाळी वारी, कान्हेगाव व सडे येथील शेकडो शेतकऱ्यांनी सर्व मोटारी बंद पाडत,पाईपलाईन फोडून टाकल्या.

माजी सभापती मच्छिंद्र टेके बोलताना म्हणाले, यंदा तालुक्यात दुष्काळ पडला आहे, जमिनी नापेर राहिल्या आहे अशा वेळी दुर्दैवाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. गोदावरी पात्रातून ते पाणी वाहिले ते आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. म्हणून आम्ही व आमच्या शेतकऱ्यांनी शासनाला विनंती करून तालुक्यातील गोदावरी नदीवरील सर्वच बंधाऱ्यात दोन फळ्या पाणी राहूद्या जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल परंतु याच गोदावरी नदीवरील शिंगवे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मात्र गोदावरी बयोरीफायनरीज हा कारखाना रात्रंदिवस २४ तास सोळा मोटारी लाऊन पाणी उपसतो आहे व उद्योगासाठी वापरात आहे. या संदर्भात आम्ही शासनाला कळवले,स्थानिक कारखाना व्यवस्थापनाला विनंती केली,वारी,कान्हेगाव, सडे या ग्रामपंचायतीनी पत्रव्यवहार केला. तरीही स्थानिक व्यवस्थापनाने दाद दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतापून पाणी उपसा करणारी यंत्रणा उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.जर व्यवस्थापने ही यंत्रणा तत्काळ उचलत पाणी उपसा बंद केला नाही तर शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन पुढील कारवाई करावी लागेल.अशी वेळ या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने जाणूनबुजून आणली असल्याचे मच्छिंद्र टेके शेवटी म्हणाले.          कारखाना व्यवस्थापणाचा ग्रामस्थांशी समन्वयाचा अभाव

गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक एस मोहन यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी पदभार स्वीकारला तेव्हा पासून स्थानिक ग्रामस्थ, कामगार, शेतकरी यांच्याशी यांचे कायमच खटके उडत आहे. परंतु आता मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने व्यवस्थापन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरriverनदी