शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

...तर, नगर शहर घेईल झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक ...

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, अहमदनगर महापालिकेत तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास नगर शहर झेप घेईल. हाच नगर शहराच्या विकासाचा मंत्र आहे, असे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा १६ मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला. तो काळ अत्यंत कठीण होता. कोविड-१९ नगर शहरात येऊन धडकला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान समोर होते. कोरोनाची परिस्थिती हातळताना इतर कामे करता आली नाहीत; पण गेल्या दहा महिन्यांत काम करताना वेळोवेळी जी उणीव भासली ती म्हणजे तांत्रिक मनुष्यबळ. तांत्रिक मनुष्यबळाअभावी अनेक अडचणी निर्माण होतात. कारभाराला गती द्यायची असेल, तर सर्वप्रथम तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करावे लागेल. एकच अधिकारी अनेक विभागांचा कारभार पाहतो आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढलेला आहे. कामे उरकत नाहीत. त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले, मायकलवार म्हणाले.

महापालिकेत पाणीपुरवठा, विद्युत, प्रकल्प, सामान्य प्रशासन, बांधकाम, अतिक्रमण, मुख्य लेखा परीक्षक, नगररचना, प्रसिद्धी, या विभागांत प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. बांधकाम विभागात तर संपूर्ण शहरासाठी दोनच अभियंते आहेत. नागिरकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे; परंतु अभियंत्यांअभावी तक्रारींचा निपटारा होत नाही. दैनंदिन कामं वेळेत पूर्ण हाेऊ शकत नाहीत. तांत्रिक मनुष्यबळच नसेल, तर नवीन प्रकल्प राबविणार कसे, असा प्रश्न आहे.

...

विभागप्रमुखांमध्ये समन्वय असावा

महापालिकेत बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगररचना, लेखा व वित्त हे महत्त्वाचे विभाग असतात. या विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक बुधवारी विभागप्रमुखांची समन्वय बैठक घेतली. त्यामुळे अडचणींवर सखोल चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागले. समन्वय नसल्याने आधी रस्ता करायचा आणि नंतर तोच रस्ता पाइपलाइन टाकण्यासाठी खोदायचा, असा प्रकार इथे सुरू होता. तो बंद केला. समन्वय बैठक या पुढील काळात सुरूच ठेवावी, जेणेकरून कारभाराला गती येईल, असे आयुक्त मायकलवार यांनी आवर्जून सांगितले.

..