शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:52 IST

370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसरकारच्या विरोधात शिवस्वराज्य यात्राकोल्हापूर, सांगलीचा परिसर महापुराने त्रस्त आहे.गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती कशी? कर्जमाफी द्यायला काय तीन वर्षे लागतात का ?370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच

शिर्डी: राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारच्या विरोधात शिवस्वराज्य यात्रा आहे. आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. शिवसेनेने अनेकदा भाजपावर टीका केली आहे. ‘तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना’ अशी भाजपा सेनेची अवस्था झाल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.शिर्डी येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीचा परिसर महापुराने त्रस्त आहे. सरकारचा भोंगळा कारभार यास कारणीभूत आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती कशी.? नियोजन नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वेळोवेळी माहिती घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. डोक्यावरून पाणी वाहायला लागल्यावर सरकार जागे झाले आहे.आज बेरोजगारीचं संकट दररोज वाढत आहे. भाजप सेनेच्या कालावधीत शेतकरी संपावर जात आहेत. जनतेला विश्वास देण्यात सरकार अपयशी आहे. युती सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला काय तीन वर्षे लागतात का ? सांगली, कोल्हापूरची परिस्थिती सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे उद्भवली आहे. आता केवळ सरकार याचा सामना करू शकत नाही. सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची गरज आहे. सरकारने अनेकांच्या मागे चौकशा लावून धाक दाखवला आहे. आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून अनेक जण भाजपात जात आहेत.370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. सगळी परिस्थिती बघून पाऊल उचलणं गरजेचं आहे. अपयश झाकण्यासाठी भाजपाची महाजनादेश यात्रा असल्याचीही टीका पवार यांनी केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीAjit Pawarअजित पवार