शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 07:20 IST

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले.

शिर्डी/पाथरी: शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री १२नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डीकरांच्या ग्रामसभेच्या मान्यतेने केली.साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. रविवारी शिर्डी कडकडीत बंद होती. फुला-हारांची दुकाने बंद असल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. रविवारी साईभक्त व ग्रामस्थांनी शहरातून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. त्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही सहभागी झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी)चा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. हे विधान मागे घेईपर्यंत शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शनिवारी घेतला होता. पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी द्वारकामाई मंदिरासमोरून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. रॅली साईमंदिराच्या बाहेर आल्यावर साईबाबांची आरती झाली. रॅलीचा समारोप मारुती मंदिराजवळ झाला. या वेळी साईबाबांचा जयघोष करून घंटानाद केला. शिर्डीत दुकाने, रेस्टॉरंट बंद असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सामाजिक संघटना, मुस्लीम बांधवांनी नाश्ता, बिस्कीट, पाणी यांचे भाविकांना वाटप केले. बंदमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले. दर्शनही सुरळीत झाले. भाविकांच्या जेवणाची व राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था साईसंस्थानने ठेवली.अभ्यास गट नेमला जाण्याची शक्यतापाथरी (जि. परभणी) हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरी ग्रामस्थांचा आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते विविध ग्रंथांतील २९ पुरावे सादर करणार आहेत. तर दुसरीकडे, साईबाबांनी आपल्या हयातीत जन्मस्थळ, जात-धर्म आणि वंशाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणूनच सर्वधर्मीय त्यांचे भक्तगण आहेत, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक अभ्यास गट नेमणार असून त्यांना सहा महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे समजते.लक्ष आजच्या बैठकीकडेहा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे पाथरी येथील कृती समितीने म्हटले आहे.पाथरीत भक्तांची गर्दीया वादामुळे देशातील मीडियात पाथरी शहर गाजत आहे. त्यामुळे पाथरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत झुंबड उडाली होती.

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबा