शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 07:20 IST

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले.

शिर्डी/पाथरी: शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री १२नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डीकरांच्या ग्रामसभेच्या मान्यतेने केली.साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. रविवारी शिर्डी कडकडीत बंद होती. फुला-हारांची दुकाने बंद असल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. रविवारी साईभक्त व ग्रामस्थांनी शहरातून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. त्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही सहभागी झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी)चा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. हे विधान मागे घेईपर्यंत शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शनिवारी घेतला होता. पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी द्वारकामाई मंदिरासमोरून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. रॅली साईमंदिराच्या बाहेर आल्यावर साईबाबांची आरती झाली. रॅलीचा समारोप मारुती मंदिराजवळ झाला. या वेळी साईबाबांचा जयघोष करून घंटानाद केला. शिर्डीत दुकाने, रेस्टॉरंट बंद असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सामाजिक संघटना, मुस्लीम बांधवांनी नाश्ता, बिस्कीट, पाणी यांचे भाविकांना वाटप केले. बंदमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले. दर्शनही सुरळीत झाले. भाविकांच्या जेवणाची व राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था साईसंस्थानने ठेवली.अभ्यास गट नेमला जाण्याची शक्यतापाथरी (जि. परभणी) हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरी ग्रामस्थांचा आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते विविध ग्रंथांतील २९ पुरावे सादर करणार आहेत. तर दुसरीकडे, साईबाबांनी आपल्या हयातीत जन्मस्थळ, जात-धर्म आणि वंशाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणूनच सर्वधर्मीय त्यांचे भक्तगण आहेत, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक अभ्यास गट नेमणार असून त्यांना सहा महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे समजते.लक्ष आजच्या बैठकीकडेहा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे पाथरी येथील कृती समितीने म्हटले आहे.पाथरीत भक्तांची गर्दीया वादामुळे देशातील मीडियात पाथरी शहर गाजत आहे. त्यामुळे पाथरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत झुंबड उडाली होती.

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबा