शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"सुजय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही"; संगमनेरमधील राड्यानंतर शालिनी विखे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:58 IST

वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध करतो पण सुजय विखे विरोधात पूर्व नियोजित कट रचण्यात आला होता असा आरोप शालिनी विखे पाटील यांनी केला.

Shalini Vikhe Patil : माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्याने अश्लाघ्य भाषेत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली. जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा महाराष्ट्रभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. जयश्री थोरातांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. कार्यक्रमानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच गाडी पेटवण्यात देखील आली. यावरुन आता सुजय विखे आणि त्यांच्या मातोश्री शालिनी विखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा सगळा सुजय विखे यांना मारण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे शालिनी विखे यांनी म्हटलं आहे.

 संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात सुजय विखे यांनी युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. सुजय विखे मंचावर असतानाच ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांत टीका करत होते. वसंतराव देशमुख्यांच्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व थोरात समर्थकांनी सुजय विखेंचे बॅनर फाडून आणि त्यांच्या गाड्या फोडून निषेध व्यक्त केला.

कालच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून हा सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता, अशी प्रतिक्रिया शालिनी विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. पण सुजय विखेसुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशेस तसे उत्तर देईल, असंही शालिनी विखे म्हणाल्या.

"वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही निषेध करतो. कोणाची जरी मुलगी असली तरी असं वाक्य कोणतीही महिला सहन करू शकत नाही आणि असं बोलण्याचाही अधिकार कोणाला नाही. कोणीही पातळी सोडून अशी वक्तव्य करू नये. प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रश्न जो तो सोडवत असतो. पण खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेय ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो. आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहेत. डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात. त्यामुळे आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेलं आहे याचाही विचार केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल. कुणीही बांगड्या भरलेल्या नाही," असं शालिनी विखे पाटील यांनी म्हटलं.

"हा सुजय विखेंना जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता हे काल दिसून आलं आहे. यांच्या गाड्यांमध्ये काठ्या होत्या, हे पोलिसांना समजलं आहे. कुणी गाड्या जाळल्या? कोण-कोण होतं हे सगळं पोलिसांना माहिती आहे. आमच्या युवकांना झालेली मारहाण ही चुकीची आहे. राजकारण करताना कोणीही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी तो डोक्यावर पडलाय हे बोलणं कितपत योग्य आहे. सुजयच्या भाषणातून कोणतीही अशी टीका झालेली नाही. कालची घटना पूर्व नियोजित कट होता. खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण सुरू आहे ते बंद करावे," असेही शालिनी विखे म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsangamner-acसंगमनेरSujay Vikheसुजय विखे