शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांची धावपळ

By admin | Updated: January 12, 2016 23:35 IST

राहुरी/अकोले : शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची रक्कम ठराविक वेळेत ऊस उत्पादकांच्या खात्यात दाखल न केल्याने साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांच्या गाळप रद्दची कारवाई

राहुरी/अकोले : शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची रक्कम ठराविक वेळेत ऊस उत्पादकांच्या खात्यात दाखल न केल्याने साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांच्या गाळप रद्दची कारवाई झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांची धावपळ उडाली. राहुरीतील प्रसाद शुगर, अकोल्यातील अगस्ती तर पाथर्डीतील वृद्धेश्वर साखर कारख्यान्यांचा त्यात समावेश आहे. कारवाईनंतर कारखाना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रसाद शुगरने तर लगेच दुसऱ्या दिवशी एफआरपीप्रमाणे उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली. या संदर्भात प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शासनाने हा परवाना तात्पुरता रद्द केला असला तरी तो पूर्ववत मिळणार असून शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांप्रमाणे भाव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या गळीत हंगामात प्रसाद शुगरने साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते़ मागील एफआरपी शंभर रूपये प्रतिटनाप्रमाणे देण्यात आली़ उर्वरित चार कोटी रुपयांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे, असे तनपुरे यांनी सांगितले. शासनाने कर्जरूपी पॅकेज देण्याची घोषणा केली होती़ मात्र, ती फसवी असून त्याचा कारखान्याला लाभ झाला नाही़ शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता जानेवारीत शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला़ प्रसाद शुगरकडे अन्य उपपदार्थ उत्पादनाचे स्त्रोत नाहीत. शासनाकडे कारखाना सुरू करण्यासाठी नियमाप्रमाणे परवानगी घेण्यात आली़ त्यानंतर कारखाना सुरू झाला़ दररोज ३२०० मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे़ राहुरी, श्रीगोंदा, गंगापूर, नेवासा या तालुक्यांतून ऊस आणून गाळप केले जात आहे़ यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केले़ (तालुका प्रतिनिधी) ‘अगस्ती’ साखर आयुक्तालयात परवाना रद्दची कारवाई होताच अकोल्यातील अगस्ती कारखान्याच्या प्रशासनाने साखर आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक वसंत बावीस्कर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपण सध्या त्याच कामासंदर्भात पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात आहोत. या निर्णयाविरोधात कारखान्याकडून अपील दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सध्या अगस्ती कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात झालेल्या या कारवाईमुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कारखान्याच्या १९ जागांसाठी १२६ अर्ज दाखल झाले.