शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन हरभरा ट्रक सोडण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:52 IST

शेवगाव येथील बहुचर्चित हरभरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्याला १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधकांकडे जमा करुन, ‘त्या’ हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक सोडण्याचा आदेश दिला आहे. 

शेवगाव : येथील बहुचर्चित हरभरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्याला १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधकांकडे जमा करुन, ‘त्या’ हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक सोडण्याचा आदेश दिला आहे. 

शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जगदंबा सहकारी संस्थेच्या, हरभरा हमीभाव केंद्रावर ८ मे रोजी सायंकाळी हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक खाली करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी या ट्रक नजरकैदेत ठेवल्या. 

नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस.आर.आभाळे यांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दिले. पोलिसांनी आमची तक्रार दाखल करुन घेतली नाही, असे त्यात म्हटले आहे. ट्रक सोडवण्यासाठी अशोक सुवलाल ललवाणी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

 ललवाणी यांच्या वकिलांनी हरभरा नाशवंत असल्याने त्या ट्रक सोडून द्याव्यात, असा युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी, न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या खंडपीठाने मालाच्या किंमती इतकी १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधक यांच्याकडे जमा करुन ‘त्या’ ट्रक सोडून देण्याचा आदेश दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, संघटना तालुका अध्यक्ष प्रवीण म्हस्के, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, अमोल देवढे, अशोक भोसले, प्रशांत घुमरे, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारी