शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतासह राजधानीत पोहोचला नगरच्या संत्र्यांचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST

केडगाव : मागील वर्षीच्या दुष्काळाचे आर्थिक चटके सहन करत, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा मोठ्या कष्टाने जगविल्या. एकीकडे संत्रा ...

केडगाव : मागील वर्षीच्या दुष्काळाचे आर्थिक चटके सहन करत, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा मोठ्या कष्टाने जगविल्या. एकीकडे संत्रा लागवडीचे क्षेत्र वाढत असताना, स्थानिक पातळीवर संत्रा खरेदी केंद्र नसल्याने व्यापारीच भाव ठरवतात. यात शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. मात्र, असे असले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत असून, नगरच्या संत्राचा गोडवा थेट दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडूसह दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आता तर व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मालखरेदी करीत आहेत.

तालुक्यात ३ हजार ९०० एकर क्षेत्रावर संत्राबागांचे उत्पादन घेतले जाते. खडकी, पिंपळगाव उज्जेनी, खंडाळा, वाळकी, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव माळवी या परिसरात संत्रा फळाचे जास्त उत्पादन घेतले जाते. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान, यामुळे या भागात संत्रा पिकांच्या बागा सध्या चांगल्याच बहरल्या आहेत. मृग नक्षत्रात संत्रा फळासाठी बहार घेतला जातो. जून महिन्यात बहार घेतल्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात फळे तोडणीस येतात. सध्या फळे तोडणीचा हंगाम सुरू झाल्याने संत्रा बागेत काढणीची लगबग सुरू आहे. फळांचा बहार गळू नये, तसेच फळगळ वाढू नये, यासाठी औषध फवारणी केली जाते. लागवड व इतर खर्च कमी येतो. मागील काही वर्षांत सततच्या दुष्काळामुळे फळांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प उत्पन्नावरच समाधान मानावे लागले, तरीही विकतचे पाणी देऊन शेतकऱ्यांनी संत्रा बागा जगविल्या. शेतकरी मुंबई मार्केटमध्ये माल विक्रीस नेतात. आता मात्र, व्यापारीच शेतकऱ्यांच्या बागेत येऊन माल खरेदी करीत आहेत. काही व्यापारी ठोक पद्धतीने शेतकऱ्यांचा मालखरेदी करीत आहेत. मालाचा भाव व्यापारीच ठरवत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. कधी-कधी यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होते. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल व्यापरी थेट केरळ, तामिळनाडू, कोलकत्ता, दिल्ली या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत. यामुळे नगरच्या संत्राचा गोडवा दक्षिण भारतासोबत राजधानीतही पोहोचला आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना प्रतिकिलो २० ते ५० रुपयांचा भाव मिळत आहे.

----

संत्रा विक्रीसाठी नगर बाजार समितीने विक्री केंद्र सुरू करावे, अशी आमची मागणी आहे. हे केंद्र सुरू झाले, तर शेतकऱ्यांची होणारी लूट बंद होईल, तसेच शेतकऱ्यांकडून आडत घेणे राज्य सरकारने बंद केले, तरीही नवी मुंबईच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाते.

- केतन निकम,

शेतकरी, खडकी

----

आमच्याकडे अमरावती येथील व्यापारी माल खरेदीसाठी आले आहेत. आम्हाला यंदा प्रती किलो ३० ते ३५ रुपये भाव मिळाला आहे. मागील वर्षी हाच भाव १४ रुपये प्रति किलो होता. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी पाणी असल्याने उत्पादन चांगले व भावही चांगला मिळाला आहे.

-कमालभाई शेख,

शेतकरी, पिंपळगाव उज्जेनी

फोटो ३० नगर संत्रा