शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:40 IST

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील दंगलीत दलित समाजावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध करणा-या तरूणांवर पोलिसांनी कलम ३०७ व ३९५ अंतर्गत कारवाई करून पुन्हा अन्याय चालविला आहे. राज्यातील हजारो तरूण आजही जेलमध्ये आहेत. या बाबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाने थेट भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.भीमा-कोरेगाव घटनेबाबत गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी नगरमध्ये होणा-या शासकीय कार्यक्रमांत प्रवेश करून या सरकारला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. या आंदोलनात रिपाइंसह समविचारी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत.भीमा-कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत व पूर्वनियोजित होती. पोलिसांनी योग्य वेळी बंदोबस्त तैनात केला असता तर घटना टळली असती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली. आंदोलन करणा-या तरूण व कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्यांना अटक केली. सुशिक्षित तरूणांवर सरकार गुन्हेगारीचा शिक्का मारत आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना ही दलित-मराठा वाद नाही. मात्र काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. या घटनेनंतर पक्षाने राज्यस्तरीय मोर्चा आयोजित करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. पक्षात राहून जर विचारांचा कडेलोट होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरेगाव-भीमा या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे न ठेवता सुनील रामानंद अथवा कृष्णप्रकाश यांच्याकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

जिग्नेश मेवानी तरूण नेतृत्व

कुठल्याही चळवळीत विशिष्ट काळानंतर नवीन नेतृत्व उदयाला येत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवानी हा तरूण नेता लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे येणा-या काळात मेवानी हे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले