शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:40 IST

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील दंगलीत दलित समाजावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध करणा-या तरूणांवर पोलिसांनी कलम ३०७ व ३९५ अंतर्गत कारवाई करून पुन्हा अन्याय चालविला आहे. राज्यातील हजारो तरूण आजही जेलमध्ये आहेत. या बाबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाने थेट भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.भीमा-कोरेगाव घटनेबाबत गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी नगरमध्ये होणा-या शासकीय कार्यक्रमांत प्रवेश करून या सरकारला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. या आंदोलनात रिपाइंसह समविचारी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत.भीमा-कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत व पूर्वनियोजित होती. पोलिसांनी योग्य वेळी बंदोबस्त तैनात केला असता तर घटना टळली असती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली. आंदोलन करणा-या तरूण व कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्यांना अटक केली. सुशिक्षित तरूणांवर सरकार गुन्हेगारीचा शिक्का मारत आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना ही दलित-मराठा वाद नाही. मात्र काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. या घटनेनंतर पक्षाने राज्यस्तरीय मोर्चा आयोजित करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. पक्षात राहून जर विचारांचा कडेलोट होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरेगाव-भीमा या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे न ठेवता सुनील रामानंद अथवा कृष्णप्रकाश यांच्याकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

जिग्नेश मेवानी तरूण नेतृत्व

कुठल्याही चळवळीत विशिष्ट काळानंतर नवीन नेतृत्व उदयाला येत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवानी हा तरूण नेता लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे येणा-या काळात मेवानी हे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले