पावसाचे पाणी घरात
By Admin | Updated: November 15, 2014 23:38 IST2014-11-15T23:32:16+5:302014-11-15T23:38:35+5:30
अहमदनगर: गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.

पावसाचे पाणी घरात
अहमदनगर: गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. याबाबत संभाजीनगरमधील नागरिकांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली आहे.
सुमारे २५ वर्षापूर्वी संभाजीनगर विकसीत झाले. त्यातील एका गल्लीत गटारीची सोयच नाही. मंजूर झालेली गटार दुसरीकडेच पळविण्यात आली. त्यामुळे पावसाचे तसेच घरातील सांडपाणी वाहून जाण्यास जागाच नाही. पर्यायाने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. रस्ता उंचीवर घरे खोलगट भागात असल्याने ही समस्या उद्भवते अशी माहिती या भागातील रहिवासी गायकवाड यांनी दिली. जुन्या असलेल्या या वसाहतीत अडीच इंची पिण्याच्या पाईपलाईनवर जवळपास ७० नळजोड आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नाही. संभाजीनगर भागात गटार व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी गोरख दाहातोंडे, गायकवाड, मकरंद कुलकर्णी यांनी केली आहे. परिसरातील ५२ नागरिकांची नावे व सह्या असलेले निवेदन आयुक्त विजय कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)